शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर रुग्णसंख्या वाढली : केळी व कांद्याला फटका तर गहू, हरभर्‍याला लाभदायक

By admin | Updated: January 22, 2016 00:09 IST

जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्‍याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्‍या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्‍याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्‍या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणारे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेर गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे.
आठ दिवसात पाच सेल्सीअसने पारा घसला
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थंडीचा जोर कायम होता. त्यानंतर जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत उन्हाचे चटके जाणवू लागले. मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होऊन उन्हाचा तडाका जाणवायला सुरुवात होते. मात्र १६ तारखेपासून उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या दरम्यान तापमाचा पारा किमान पाच सेल्सीअस अंशानी घसरला आहे.
वातावरण बदलामुळे रुग्णसंख्या वाढली
जानेवारीच्या पंधरवड्यात उष्ण आणि त्यापाठोपाठ थंड हवामानामुळे सर्दी व तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे. फ्ल्यू, मलेरिया तसेच हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरण बदलामुळे घश्याच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
केळी व कांद्याच्या पिकाला फटका
या थंडीचा केळी आणि कांद्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगासाठी हे वातावरण लाभदायक असल्याने केळीवर करपा व सरका या रोगाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. तर कांद्यावरदेखील करपा रोगाचा प्रार्दुभाव असण्याची शक्यता आहे. करपा व सरका या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी बुरशीनाशकाची फवारणी करावी असे तज्ज्ञांनी सुचविले आहे. वाढत्या थंडीचा गहू व हरभर्‍यासह कोरडवाहू पिकांना मात्र चांगला लाभ होणार आहे. यावर्षी जिल्‘ात अत्यल्प पाऊस झाल्याने गव्हाचे क्षेत्र केवळ २० हजार हेक्टरवर आहे. थंडीमुळे जमिन ओलसर राहणार असल्याने त्याचा लाभ गव्हाला होणार आहे. यासह रब्बी ज्वारीलादेखील याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्‘ातील तापमान

जळगाव८
भुसावळ८
अमळनेर११
बोदवड११
भडगाव११
चोपडा८
चाळीसगाव९
धरणगाव११
एरंडोल१०
फैजपूर१२
जामनेर८
मुक्ताईनगर१२
पारोळा१२
पाचोरा११
रावेर१२
सावदा१२
वरणगाव१२
यावल८