शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"प्लीज, आई-बाबांची ट्रान्सफर..."; 2 चिमुकल्या मुलींनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं इमोशनल पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:01 IST

12 वर्षांच्या अर्चिता आणि अर्चना या दोन्ही बहिणींना आई-वडिलांसोबत राहून शिक्षण घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.

लहान असताना पालकांशिवाय राहिल्याने मुलांच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. अनेक पालक छोट्या शहरात किंवा गावांमध्ये बदली झाल्यावर, आपल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे शिक्षणासाठी ठेवतात. जेणेकरून मुलांना चांगलं शिक्षण घेता येईल. मात्र अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्या पालकांची खूप आठवण येते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. 

जयपूरमध्ये राहणाऱ्या 12 वर्षांच्या अर्चिता आणि अर्चना या दोन्ही बहिणींना आई-वडिलांसोबत राहून शिक्षण घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी लिहिलं की, "माननीय पंतप्रधान मोदीजी, माझं नाव अर्चिता आणि माझ्या बहिणीचं नाव अर्चना आहे. आम्ही दोघी 12 वर्षांच्या आहोत. आम्ही दोघीही दिल्ली पब्लिक स्कूल, बांदीकुई येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आहोत. आम्ही दोघी आमच्या काका-काकींकडे राहतो." 

"आमच्या वडिलांचे नाव देवपाल मीना आणि आईचं नाव हेमतला कुमारी मीना असं आहे. आमचे वडील पंचायत समिती चौथण येथे सहायक लेखाधिकारी म्हणून काम करतात. आमची आई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, देवडा ब्लॉकमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. आम्हाला दोघींना आमच्या आई-वडिलांची खूप आठवण येते आणि त्यांच्याशिवाय आमचं अभ्यासात मन लागत नाही. आमच्या आई-वडिलांची बदली जयपूर, राजस्थान येथे व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आम्हालाही जयपूरला आमच्या पालकांसोबत राहून तिथे शिक्षण घ्यायचे आहे."

"बेटी बचाओ, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना इत्यादी तुमच्या अनेक योजना आम्ही ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. त्यामधून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे. आम्हालाही आमच्या पालकांसोबत राहून त्यांचं नाव खूप मोठं करायचं आहे. कृपया आमच्या पालकांची जगतपुरा, जयपूर येथे बदली करा. आम्ही तुमचे अत्यंत ऋणी राहू." मुलींनी यानंतर खाली त्यांची नावं लिहिली आहेत. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTransferबदली