शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

प्रेरणादायी! परीक्षेत 19 वेळा झाला नापास पण नंतर केला जिद्दीने अभ्यास; आता झाला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:39 IST

काही लोक परीक्षेत नापास झाले असले तरी आज मोठमोठ्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल समोर येत आहेत. प्रत्येकाला आपल्या मार्कांची आणि पास-नापास होण्याची चिंता असते. निकालानंतर सर्वजण टॉपर्सबद्दल बोलतात. ते त्यांच्या मार्कशीट शेअर करतात, पण परीक्षेत कमी मार्क्स मिळवणाऱ्या मुलांबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्यामुळेच अनेक वेळा तणावाखाली असलेली मुले टोकाचं पाऊल उचलतात. याच दरम्यान अनेक प्रेरणादायी घटना या पुढे येत असतात. काही लोक परीक्षेत नापास झाले असले तरी आज मोठमोठ्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

परीक्षेमध्ये वारंवार अपयश आले पण एका तरुणाने हार नाही मानली आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. परीक्षेत तब्बल 19 वेळा नापास झाला पण नंतर जिद्दीने अभ्यास केला आणि आता अधिकारी झाल्य़ाची घटना घडली आहे. राजस्थानमधील एका तरुणाने आरएएस (RAS) परीक्षेत 55 वा क्रमांक पटकावला आहे. दलपत सिंह असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएएस दलपत सिंह हे मोहनलाल सुखाडिया विद्यापीठात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ते एक-दोन नव्हे तर 19 वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नापास झाले. 

दहावीत त्यांना कमी मार्क मिळाले होते तर बारावीत दोनदा नापास झाले. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी परीक्षा दिली. कॉलेजमध्येही ते अनेकदा नापास झाले. PMT, BSTC, PET, Agriculture Department, STE अशा अनेक परीक्षा दिल्या पण सगळ्यात नापास झाले. याच दरम्यान दलपत सिंह यांचा बालपणीचा मित्र आयएएस झाला. यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णयही घेतला. जोरदार तयारी केली आणि आता आरएएस परीक्षा-2008 मध्ये 55 वा क्रमांक मिळवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.