शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथमध्ये अडकलेले जिल्ह्यातील भाविक जम्मूकडे सुखरूप परतले गुरुवारी जळगावात परतणार : सुरक्षा दलातील जवानांची कडक सुरक्षा

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.
अमरनाथ यात्रेसाठी जळगावसह खान्देशातून भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांचा एक ग्रुप अमरनाथ यात्रेला काही दिवसांपूर्वी रवाना झाला होता. त्यात कांदा व्यापारी चंद्रकांत अशोक पाटील, राजू रमेश ठाकूर, भरत वासुदेव पाटील, अजय पाटील, सुभाष भोई हे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जळगाव येथील एलआयसीचे अधिकारी श्याम कोठावदेही आहेत. परंतु काश्मिरातील हिंसाचारामुळे हेे व्यापारी शनिवार व रविवार बालटालमध्येच अडकले होते.

ताणावग्रस्त स्थिती, रस्त्यांवर जळते टायर, दगड
रविवारी बालटालमध्ये ५० रुपये लीटर या दरात पिण्याचे पाणी मिळत होते. भाविकांमधील भीती व अडचणी लक्षात घेता. सुरक्षा दलातील अधिकार्‍यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर (रात्री २ वाजता) बालटालमध्ये अडकलेल्या सर्व दोन हजार भाविकांना ८०० लहान खाजगी चारचाकींमधून बालटालमधून श्रीनगरकडे आणले. भाविकांच्या चारचाकींच्या मागे व पुढे सुरक्षा दलातील जवान, अधिकारी यांच्या अनेक मोटारी होत्या. बालटाल ते श्रीनगर या दरम्यानच्या रस्त्यांवर दगडांचा खच होता. अनेक ठिकाणी टायर जाळले होते. ते दगड दूर करीत सुरक्षा दलातील जवानांनी भाविकांना श्रीनगरपुढे ५० कि.मी.पर्यंत सोडले.

भाविक जम्मूमध्ये
सोमवारी सकाळी भाविक जम्मू येथे सुरक्षित परतले. त्यांनी वैष्णव देवीचे दर्शन घेतले. येत्या गुरुवारी जळगाव शहरातील व्यापार्‍यांचा ग्रुप व इतर भाविक जम्मू येथून विमानाने मुंबईत येणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत हे भाविक शहरात परततील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.