शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

अमरनाथमध्ये अडकलेले जिल्ह्यातील भाविक जम्मूकडे सुखरूप परतले गुरुवारी जळगावात परतणार : सुरक्षा दलातील जवानांची कडक सुरक्षा

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.
अमरनाथ यात्रेसाठी जळगावसह खान्देशातून भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांचा एक ग्रुप अमरनाथ यात्रेला काही दिवसांपूर्वी रवाना झाला होता. त्यात कांदा व्यापारी चंद्रकांत अशोक पाटील, राजू रमेश ठाकूर, भरत वासुदेव पाटील, अजय पाटील, सुभाष भोई हे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जळगाव येथील एलआयसीचे अधिकारी श्याम कोठावदेही आहेत. परंतु काश्मिरातील हिंसाचारामुळे हेे व्यापारी शनिवार व रविवार बालटालमध्येच अडकले होते.

ताणावग्रस्त स्थिती, रस्त्यांवर जळते टायर, दगड
रविवारी बालटालमध्ये ५० रुपये लीटर या दरात पिण्याचे पाणी मिळत होते. भाविकांमधील भीती व अडचणी लक्षात घेता. सुरक्षा दलातील अधिकार्‍यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर (रात्री २ वाजता) बालटालमध्ये अडकलेल्या सर्व दोन हजार भाविकांना ८०० लहान खाजगी चारचाकींमधून बालटालमधून श्रीनगरकडे आणले. भाविकांच्या चारचाकींच्या मागे व पुढे सुरक्षा दलातील जवान, अधिकारी यांच्या अनेक मोटारी होत्या. बालटाल ते श्रीनगर या दरम्यानच्या रस्त्यांवर दगडांचा खच होता. अनेक ठिकाणी टायर जाळले होते. ते दगड दूर करीत सुरक्षा दलातील जवानांनी भाविकांना श्रीनगरपुढे ५० कि.मी.पर्यंत सोडले.

भाविक जम्मूमध्ये
सोमवारी सकाळी भाविक जम्मू येथे सुरक्षित परतले. त्यांनी वैष्णव देवीचे दर्शन घेतले. येत्या गुरुवारी जळगाव शहरातील व्यापार्‍यांचा ग्रुप व इतर भाविक जम्मू येथून विमानाने मुंबईत येणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत हे भाविक शहरात परततील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.