शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

 "सरकारला हिंसाचार घडवायचा होता, पोलीस तमाशा बघायला बसले होते", असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:54 IST

Jahangirpuri Violence : सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्‍या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, आज खुद्द दिल्ली पोलिस आयुक्तांनी जहांगीरपुरीमध्ये काढलेली मिरवणूक परवानगीशिवाय काढण्यात आल्याचे सांगितले आहे. मिरवणूक काढली जात असताना पोलीस काय करत होते? पोलीस तमाशा बघायला बसले होते? मिरवणुकीत शस्त्रांची काय गरज होती? लोकांच्या हातात पिस्तूल होते. तलवार आणि चाकू असणे धार्मिक आहे का? तसेच विविध प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

जातीय हिंसाचार तेव्हाच होतो जेव्हा सरकारला हवे असते, सरकारची इच्छा नसते तेव्हा होत नाही. त्यामुळे इथेही सरकारने जातीय हिंसाचार घडू दिला. सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्‍या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

याचबरोबर, दिल्ली पोलिसांच्या अटकेवरही असदुद्दीन ओवेसींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.  ते म्हणाले, "अन्सार नावाची व्यक्ती, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो एका मुलाला समजावून सांगत आहे की त्याला का अटक करण्यात आली. पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. अन्सारचे जे हिंदू शेजारी आहेत, ते स्वतःच त्याच्या चारित्र्याची स्तुती करत आहेत. अन्सार दंगलीवर नियंत्रण ठेवत होता." याशिवाय,  असदुद्दीन ओवेसींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांवरच आरोप केले आहेत. ते निवडणुकीत मुस्लिमांचे हित साधतात आणि आता असे बोलत आहेत." 

मी दिल्ली सरकार आणि मोदी सरकारवर आरोप करत आहे. एकतर्फी कारवाई केली जात आहे. मशिदीसमोर झेंडे लावले जातात, तो व्हिडिओ कोणी का दाखवत नाही. तुम्ही निवडक कायदा लागू करत आहात. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, असे असदुद्दीन ओवेसींनी सांगितले. तर दिल्ली पोलिसांवर आरोप करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'तुमचे अपयश लपवण्यासाठी किमान खोटे बोलू नका.'

नेमक काय घडलं?जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. त्यात एका स्थानिक व्यक्तीसह आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले. यादरम्यान एका पोलिसाला गोळीही लागली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली असून आणखीही काही जणांना अटक होणार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी बंदुका आणि दारूगोळाही जप्त केला आहे.

शनिवारच्या हिंसाचारानंतर पोलीस एका महिलेला चौकशीसाठी घेऊन गेले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी जहांगीरपुरी परिसरातील सुमारे 50 महिलांनी निषेध आणि दगडफेक सुरू केली. पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती आरोपी सोनूची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. सोनूने शनिवारी गोळीबार केला होता. महिलेला पोलीस चौकशीसाठी नेल्यानंतर सोमवारी वेगवेगळ्या घरांच्या छतावरुन पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीdelhiदिल्ली