शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

 "सरकारला हिंसाचार घडवायचा होता, पोलीस तमाशा बघायला बसले होते", असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:54 IST

Jahangirpuri Violence : सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्‍या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, आज खुद्द दिल्ली पोलिस आयुक्तांनी जहांगीरपुरीमध्ये काढलेली मिरवणूक परवानगीशिवाय काढण्यात आल्याचे सांगितले आहे. मिरवणूक काढली जात असताना पोलीस काय करत होते? पोलीस तमाशा बघायला बसले होते? मिरवणुकीत शस्त्रांची काय गरज होती? लोकांच्या हातात पिस्तूल होते. तलवार आणि चाकू असणे धार्मिक आहे का? तसेच विविध प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

जातीय हिंसाचार तेव्हाच होतो जेव्हा सरकारला हवे असते, सरकारची इच्छा नसते तेव्हा होत नाही. त्यामुळे इथेही सरकारने जातीय हिंसाचार घडू दिला. सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्‍या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

याचबरोबर, दिल्ली पोलिसांच्या अटकेवरही असदुद्दीन ओवेसींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.  ते म्हणाले, "अन्सार नावाची व्यक्ती, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो एका मुलाला समजावून सांगत आहे की त्याला का अटक करण्यात आली. पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. अन्सारचे जे हिंदू शेजारी आहेत, ते स्वतःच त्याच्या चारित्र्याची स्तुती करत आहेत. अन्सार दंगलीवर नियंत्रण ठेवत होता." याशिवाय,  असदुद्दीन ओवेसींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांवरच आरोप केले आहेत. ते निवडणुकीत मुस्लिमांचे हित साधतात आणि आता असे बोलत आहेत." 

मी दिल्ली सरकार आणि मोदी सरकारवर आरोप करत आहे. एकतर्फी कारवाई केली जात आहे. मशिदीसमोर झेंडे लावले जातात, तो व्हिडिओ कोणी का दाखवत नाही. तुम्ही निवडक कायदा लागू करत आहात. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, असे असदुद्दीन ओवेसींनी सांगितले. तर दिल्ली पोलिसांवर आरोप करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'तुमचे अपयश लपवण्यासाठी किमान खोटे बोलू नका.'

नेमक काय घडलं?जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. त्यात एका स्थानिक व्यक्तीसह आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले. यादरम्यान एका पोलिसाला गोळीही लागली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली असून आणखीही काही जणांना अटक होणार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी बंदुका आणि दारूगोळाही जप्त केला आहे.

शनिवारच्या हिंसाचारानंतर पोलीस एका महिलेला चौकशीसाठी घेऊन गेले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी जहांगीरपुरी परिसरातील सुमारे 50 महिलांनी निषेध आणि दगडफेक सुरू केली. पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती आरोपी सोनूची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. सोनूने शनिवारी गोळीबार केला होता. महिलेला पोलीस चौकशीसाठी नेल्यानंतर सोमवारी वेगवेगळ्या घरांच्या छतावरुन पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीdelhiदिल्ली