शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

CoronaVirus News : जगन्नाथ रथयात्रा न्यायालयाकडून स्थगित; कारागिरांच्या डोळ्यांत आले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:27 IST

जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.

पुरी (ओदिशा) : जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथांची रथयात्रा यावर्षी कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे काढली जाणार नाही, हे वृत्त समजताच हा महारथ तयार करण्याचे काम असलेल्या असंख्य कारागिरांच्या डोळ्यांत पाणी आले. जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी दिलेल्या आदेशात नागरिकांच्या आरोग्यहितासाठी यावर्षी जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले. नऊ दिवसांचा हा रथयात्रा महोत्सव २३ जूनपासून सुरू होईल. श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती आणि सेवेकऱ्यांनी राज्य सरकारला विनंती केली की, त्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका करावी. १७३६ पासून ही रथ यात्रा कोणताही अडथळा न येता सुरू राहिली होती. १५५८ आणि १७३५ यादरम्यान मुघलांच्या स्वाऱ्यांमुळे ३२ वेळा रथयात्रा झाली नव्हती, असे जगन्नाथ संस्कृतीचे संशोधक भास्कर मिश्र यांनी सांगितले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बातमी वाचल्यावर मला धक्काच बसला. रथावर शेवटचा हात फिरवत असताना मला ही बातमी समजली,’ असे भगवान जगन्नाथ रथ ‘नंदिघोष’चे मुख्य सुतार बिजय कुमार महापात्रा यांनी सांगितले. ‘रथांचे काम पूर्ण झाल्यानंतर ते वापरले जाणार नाहीत अशी परिस्थिती याआधी कधी आल्याचे मी पाहिले नव्हते. मी लहानपणापासून रथनिर्मितीत गुंतलेला आहे. असे भगवान बलभद्र यांच्या ‘तलध्वज’ रथाचे मुख्य सुतार नरसिंह महापात्रा यांनी सांगितले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. महापात्रा म्हणाले, ‘जर रथ मंदिरासमोरील विशाल रस्त्यावर ओढलेच जाणार नसतील, तर आमची कोरोना चाचणी करून उपयोग काय? रथबांधणीचे काम करणाºयांपैकी अनेक जण म्हणाले की, ‘आम्ही पैशांसाठी हे काम करीत नाहीत, तर जगन्नाथांवरील प्रेम, आदर म्हणून. रथ खाला (मंदिराची कार्यशाळा) वगळता इतरत्र कुठेही आमच्यासह कोणीही असे सुंदर रथ तयार करू शकत नाहीत. कोणतेही औपचारिक शिक्षण नसलेले लोक एवढे आकर्षक रथ बनवू शकतात, ही भगवंतांचीच इच्छा आहे.’>रथयात्रा रोखणे हा मोठा कट -सरस्वतीभुवनेश्वर : भगवान जगन्नाथांची रथयात्रा होऊ न देण्याचा मोठा कट असल्याचा आरोप पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रविवारी केला.सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशात त्यानेच बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका राज्य सरकारने करावी, अशी विनंती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे गजपती महाराज दिव्यासिंघ डेब आणि सेवेकºयांनी केल्यानंतर सरस्वती यांनी हा आरोप केला आहे.एका व्हिडिओ मेसेजमध्ये शंकराचार्य म्हणाले की, ‘२० जून रोजी सर्वोच्च न्यायालय त्याच्या १८ जून रोजी दिलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका स्वीकारू शकले असते. सुटीच्या दिवसांतही महत्त्वाची प्रकरणे सुनावणीस घेणे ही रूढी आहे.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या