शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

CoronaVirus News : जगन्नाथ रथयात्रा न्यायालयाकडून स्थगित; कारागिरांच्या डोळ्यांत आले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:27 IST

जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.

पुरी (ओदिशा) : जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथांची रथयात्रा यावर्षी कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे काढली जाणार नाही, हे वृत्त समजताच हा महारथ तयार करण्याचे काम असलेल्या असंख्य कारागिरांच्या डोळ्यांत पाणी आले. जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी दिलेल्या आदेशात नागरिकांच्या आरोग्यहितासाठी यावर्षी जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले. नऊ दिवसांचा हा रथयात्रा महोत्सव २३ जूनपासून सुरू होईल. श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती आणि सेवेकऱ्यांनी राज्य सरकारला विनंती केली की, त्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका करावी. १७३६ पासून ही रथ यात्रा कोणताही अडथळा न येता सुरू राहिली होती. १५५८ आणि १७३५ यादरम्यान मुघलांच्या स्वाऱ्यांमुळे ३२ वेळा रथयात्रा झाली नव्हती, असे जगन्नाथ संस्कृतीचे संशोधक भास्कर मिश्र यांनी सांगितले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बातमी वाचल्यावर मला धक्काच बसला. रथावर शेवटचा हात फिरवत असताना मला ही बातमी समजली,’ असे भगवान जगन्नाथ रथ ‘नंदिघोष’चे मुख्य सुतार बिजय कुमार महापात्रा यांनी सांगितले. ‘रथांचे काम पूर्ण झाल्यानंतर ते वापरले जाणार नाहीत अशी परिस्थिती याआधी कधी आल्याचे मी पाहिले नव्हते. मी लहानपणापासून रथनिर्मितीत गुंतलेला आहे. असे भगवान बलभद्र यांच्या ‘तलध्वज’ रथाचे मुख्य सुतार नरसिंह महापात्रा यांनी सांगितले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. महापात्रा म्हणाले, ‘जर रथ मंदिरासमोरील विशाल रस्त्यावर ओढलेच जाणार नसतील, तर आमची कोरोना चाचणी करून उपयोग काय? रथबांधणीचे काम करणाºयांपैकी अनेक जण म्हणाले की, ‘आम्ही पैशांसाठी हे काम करीत नाहीत, तर जगन्नाथांवरील प्रेम, आदर म्हणून. रथ खाला (मंदिराची कार्यशाळा) वगळता इतरत्र कुठेही आमच्यासह कोणीही असे सुंदर रथ तयार करू शकत नाहीत. कोणतेही औपचारिक शिक्षण नसलेले लोक एवढे आकर्षक रथ बनवू शकतात, ही भगवंतांचीच इच्छा आहे.’>रथयात्रा रोखणे हा मोठा कट -सरस्वतीभुवनेश्वर : भगवान जगन्नाथांची रथयात्रा होऊ न देण्याचा मोठा कट असल्याचा आरोप पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रविवारी केला.सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशात त्यानेच बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका राज्य सरकारने करावी, अशी विनंती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे गजपती महाराज दिव्यासिंघ डेब आणि सेवेकºयांनी केल्यानंतर सरस्वती यांनी हा आरोप केला आहे.एका व्हिडिओ मेसेजमध्ये शंकराचार्य म्हणाले की, ‘२० जून रोजी सर्वोच्च न्यायालय त्याच्या १८ जून रोजी दिलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका स्वीकारू शकले असते. सुटीच्या दिवसांतही महत्त्वाची प्रकरणे सुनावणीस घेणे ही रूढी आहे.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या