शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

जाधव यांना संपर्क का नाकारला?

By admin | Updated: May 20, 2017 03:36 IST

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दूतावास संपर्क (काऊंसलर अ‍ॅक्सेस) का नाकारण्यात आला, असा सवाल आता पाकिस्तानातील नागरिकच उपस्थित

- लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था

नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दूतावास संपर्क (काऊंसलर अ‍ॅक्सेस) का नाकारण्यात आला, असा सवाल आता पाकिस्तानातील नागरिकच उपस्थित करू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानातून अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने १६ वेळा विनंती केली होती; पण पाकिस्तानने ही विनंती मान्य केली नाही. पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या असमा जहाँगीर याबाबत बोलताना म्हणाल्या की, जाधव यांना संपर्क नाकारण्याचा सल्ला प्रथम कोणी दिला होता. भारतीय तुरुंगात असलेल्या कैद्यांचा अधिकार त्यामुळे धोक्यात येणार नाही का? आंतरराष्ट्रीय कायदा बदलता येऊ शकतो? पाकिस्तानातील एक वकील यासीर लतीफ हमदानी यांनी म्हटले आहे की, जाधव यांना सुरुवातीपासूनच दूतावास संपर्क देण्याची आवश्यकता होती. सुनावणी पूर्ण होण्याच्या आत जाधव यांना फाशी देण्यात येणार नाही, अशी हमी पाकिस्तानने न दिल्यानेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेतली. दूतावास संपर्क न पुरविणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे, असेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. आईच्या अपिलावर विचार केला आहे काय?कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारे अपील जाधव यांच्या आईने केलेले आहे; पण या अपिलावर पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी विचार केला आहे काय? याबाबत अनिश्चितता कायम आहे. जाधव यांना शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी ४० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास एक दिवस शिल्लक असताना हा प्रश्न उपस्थित झाला आहे. १० एप्रिल रोजी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी २६ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या विदेश सचिव तेमानिया जंजुआ यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी जाधव यांच्या आईचे अपील सादर केले होते. जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांकडे ६० दिवसांच्या आत दया याचिका दाखल करता येऊ शकते, तर राष्ट्रपतींकडे ९० दिवसांच्या आत दया याचिका दाखल करता येते.पाकिस्तानकडून वकिलांची नवी टीमआंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानात सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे हा खटला लढण्यासाठी सरकार आता वकिलांची नवी टीम देणार आहे. पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितले की, नवी टीम पाकिस्तानची भूमिका प्रभावीपणे सादर क रील. पाकिस्तानचे माजी अ‍ॅटर्नी जनरल इरफान कादीर यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलांना अनुभव नाही. आम्हाला पाकिस्तानसाठी समर्पित, सशक्त टीमची आवश्यकता आहे.सेहवाग म्हणाला, ‘सत्यमेव जयते’ आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यात क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांचाही समावेश होता. सेहवागने टिष्ट्वट केले आहे, ‘सत्यमेव जयते’. मोहम्मद कैफने टिष्ट्वट केले आहे ‘अभिनंदन, न्याय देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आभार’.विरोधकांचा शरीफ यांच्यावर हल्लाबोल जाधव प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप करीत पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरीफ आणि भारतीय उद्योगपती सज्जन जिंदल यांच्यात गुप्त बैठक झाली होती. आयसीजेचा निर्णय म्हणजे या बैठकीचाच परिणाम असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्सानचे नेते शफाकत महेमूद यांनी केला आहे. जिंदल यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर हा खेळ सुरू झाला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.