शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

आरोपींच्या अटकेसाठी आयजींना साकडे व्यापारी आत्महत्या प्रकरण : पोलीस यंत्रणेवर केले आरोप

By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST

जळगाव: आईसक्रीमचा व्यवसाय करणारे अण्णासा वामनसा क्षत्रीय (वय ४९ रा.आनंद नगर महाबळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याने त्यांची पत्नी वर्षा क्षत्रिय व त्यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांची नाशिक येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली.

जळगाव: आईसक्रीमचा व्यवसाय करणारे अण्णासा वामनसा क्षत्रीय (वय ४९ रा.आनंद नगर महाबळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याने त्यांची पत्नी वर्षा क्षत्रिय व त्यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांची नाशिक येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली.
क्षत्रीय यांनी २६ नोव्हेंबर रोजी बांभोरी शिवारातील गोडावूनमध्ये जाळून घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी धुळे येथील माजी नगराध्यक्ष चंद्रमल प्रधानमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंद गोटूमल दुसेजा, कैलास रामदास पाटील व उत्तम माणिक पाटील (रा.नासिक) या पाच जणांवर धरणगाव पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चंद्रमल गलाणी, राजेश गलाणी व गोविंद दुसेजा या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे तर कैलास पाटील याला खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. पाचवा आरोपी उत्तम पाटील याला मात्र पोलिसांनी अटक केली होती. आरोपींना अटक करण्याबाबत वारंवार पोलिसांना भेटलो, मात्र ते फरार असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप क्षत्रिय यांच्या पत्नीने केला आहे.

१२० ब दाखल केला नाही
दरम्यान, या गुन्‘ात कलम १०७ व १२० ब चे वाढीव कलम लावण्याबाबत तपासाधिकारी व त्यांच्या वरिष्ठांना भेटले असता त्याचीही दखल घेण्यात आली नाही. आरोपींना अटक होऊ नये त्यासाठी यंत्रणेकडून त्यांना अभय दिले जात आहे. पुरवणी जबाबानुसार काहीजणांचे नाव समाविष्ट करणे अपेक्षित असताना तेदेखील केले नाही, असेही क्षत्रिय यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

कोट..
आरोपींचा बचाव करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे किंवा निलंबित करावे.माझ्याकडे अतिरक्त पुरावे आहेत ते दाखल करुन घ्यासे व माझे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश पारित करू नये. या प्रकरणात न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे.
-वर्षा क्षत्रिया, तक्रारदार