शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या अटकेसाठी आयजींना साकडे व्यापारी आत्महत्या प्रकरण : पोलीस यंत्रणेवर केले आरोप

By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST

जळगाव: आईसक्रीमचा व्यवसाय करणारे अण्णासा वामनसा क्षत्रीय (वय ४९ रा.आनंद नगर महाबळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याने त्यांची पत्नी वर्षा क्षत्रिय व त्यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांची नाशिक येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली.

जळगाव: आईसक्रीमचा व्यवसाय करणारे अण्णासा वामनसा क्षत्रीय (वय ४९ रा.आनंद नगर महाबळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याने त्यांची पत्नी वर्षा क्षत्रिय व त्यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांची नाशिक येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली.
क्षत्रीय यांनी २६ नोव्हेंबर रोजी बांभोरी शिवारातील गोडावूनमध्ये जाळून घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी धुळे येथील माजी नगराध्यक्ष चंद्रमल प्रधानमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंद गोटूमल दुसेजा, कैलास रामदास पाटील व उत्तम माणिक पाटील (रा.नासिक) या पाच जणांवर धरणगाव पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चंद्रमल गलाणी, राजेश गलाणी व गोविंद दुसेजा या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे तर कैलास पाटील याला खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. पाचवा आरोपी उत्तम पाटील याला मात्र पोलिसांनी अटक केली होती. आरोपींना अटक करण्याबाबत वारंवार पोलिसांना भेटलो, मात्र ते फरार असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप क्षत्रिय यांच्या पत्नीने केला आहे.

१२० ब दाखल केला नाही
दरम्यान, या गुन्‘ात कलम १०७ व १२० ब चे वाढीव कलम लावण्याबाबत तपासाधिकारी व त्यांच्या वरिष्ठांना भेटले असता त्याचीही दखल घेण्यात आली नाही. आरोपींना अटक होऊ नये त्यासाठी यंत्रणेकडून त्यांना अभय दिले जात आहे. पुरवणी जबाबानुसार काहीजणांचे नाव समाविष्ट करणे अपेक्षित असताना तेदेखील केले नाही, असेही क्षत्रिय यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

कोट..
आरोपींचा बचाव करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे किंवा निलंबित करावे.माझ्याकडे अतिरक्त पुरावे आहेत ते दाखल करुन घ्यासे व माझे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश पारित करू नये. या प्रकरणात न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे.
-वर्षा क्षत्रिया, तक्रारदार