शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

म्हणे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त 60 मिनिटांत

By admin | Updated: March 1, 2017 13:06 IST

जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल असा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - दिल्लीहून मुंबईचा प्रवास फक्त 60 मिनिटांत आणि मुंबई ते चेन्नई प्रवास 30 मिनिटांत पुर्ण होऊ शकतो का ? तसं पाहायला गेलं तर विमानालाही यापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका अशा टेक्नॉलॉजीवर चर्चा केली आहे ज्यामुळे हे सत्यात उतरु शकतं आणि तुम्ही बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने प्रवास करु शकता. अमेरिकेतील कंपनी 'हायपरलूप वन' भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यांनी दावा केला आहे की चुंबकीय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान आणि प्रवाशांना अत्यंत वेगाने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवलं जाऊ शकतं. 
 
 (सुपरफास्ट! दुबई ते अबुधाबी प्रवास अवघ्या 12 मिनिटांत)
 
हायपरलूप बनवण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपनीने भारतात पाच मार्ग सुचवले आहेत. यामध्ये बंगळुरू ते चेन्नई, बंगळुरू ते तिरुवअनंतपुरम, मुंबई ते चेन्नई आणि बंगळुरू ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे.
 
जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने ‘भारतासाठी हायपरलूप वन व्हिजन’ या संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. संमेलनात सादरीकरणावेळी कंपनीने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल, असा दावा केला. 
 
'अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत', असं सुरेश प्रभू यांनी कार्यक्रम संपल्यानंतर सांगितलं आहे. 'मुंबई ते दिल्ली 60 मिनिटं आणि चेन्नई ते मुंबई फक्त 30 मिनिटांत प्रवास करण्याबाबत विचार केला जात आहे. भारतीय रेल्वे आधुनिकीकरण आणि वेग वाढवण्यावर जोर देत आहे. वेगावर आमचं मुख्य लक्ष असून तो वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत', असं सुरेश प्रभू बोलले आहेत.