शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नितीश कुमारांवर हत्येचा आरोप, लालू प्रसाद यादवांचा पलटवार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 10:19 IST

संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बुधवारी मोठा राजकीय भूकंप केला आहे.

पाटणा, दि. 27 - संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बुधवारी मोठा राजकीय भूकंप केला आहे. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी बुधवारी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान नितीश कुमार यांनी बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. यावरुन लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमारांवर हत्येचा आरोप करत पलटवार केला आहे. 

लालू यांनी पत्रकार परिषद घेत पुरावा म्हणून काही कागदपत्रं सादर केली. यावेळी लालू म्हणाले की, नितीश कुमार यांना अडचणीत येण्याचा अंदाज आला, यासाठी त्यांनी भाजपासोबत आधीच सेटिंग केले. येथे नितीश यांनी राजीनामा दिला तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाचं ट्विट केले.  हे सर्व काही सेटिंग असल्याचे सिद्ध होत आहे, असेही लालू म्हणाले.

लालू प्रसाद यादव पुढे असेही म्हणाले की, मी रात्रीदेखील नितीश यांच्यासोबत 40 मिनिटं संवाद साधला. मात्र त्यांनी कोणत्या प्रकारे राजीनाम्याची मागणी केली नव्हती. नितीश केवळ एवढंच म्हणाले की, आरोपांबाबत स्पष्टीकरण द्या, काहीही घाई नाही. यावर आम्ही म्हटले की आरोपांमध्ये त्रुटी आहेत, जेडीयू काही सीबीआय नाही. जे काही स्पष्टीकरण द्यायचे आहेत, ते सार्वजनिक करू, तपास यंत्रणांना सांगू. 

पुढे ते असेही म्हणाले की, नितीश कुमार यांना माहिती होते की, राजीनामा घेण्यासाठी काहीही आधार नाही. यावेळी लालूंनी नितीश कुमारांवर खळबळजनक आरोप करत सांगितले की, नितीश कुमार यांच्यावर 302 कलमांतर्गत आरोप करण्यात आलेत. त्यांना ही बाब माहिती होती देशातील पहिला असा मुख्यमंत्री आहे ज्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे आणि याची दखलही घेतली गेली आहे. या गुन्ह्यांतर्गत त्यांना आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. यावेळी लालू यांनी नितीश कुमार यांचं शपथपत्रदेखील सादर केले. हे प्रकरण पाटणा हायकोर्टात सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शिवाय, आता आपण वाचणार नाही, ही बाब नितीश यांना माहीत झाली होती. म्हणून त्यांनी आपला राजीनामा देण्याची खेळी खेळली. नितीश हे आरएसएस व भाजपासोबत मिळालेले आहे. 

लालूंनी पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणानितीश कुमारांना टीकास्त्र सोडण्यासोबत यावेळी लालूंनी पंतप्रधान मोदी व भाजपालाही टार्गेट केले. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्वरित ट्विट करत त्यांचे कौतुक केले. यावर लालू म्हणालेत की, काय सेटिंग आहे देशाच्या पंतप्रधानांची लगेच ट्विटदेखीस केले. भाजपाचे समर्थन घेणार का?, असे एका पत्रकारानं नितीश यांना विचारल्यानंतर त्यांनी नकार दर्शवला नाही. सर्व सेटिंग आहे. जाताना मी नितीश यांना म्हटलेदेखील, ''असे करू नका, जातीय शक्ती आपल्याला रोखू इच्छिते, त्यांच्याच मांडीवर जाऊन खेळू नका''.