शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नितीश कुमारांवर हत्येचा आरोप, लालू प्रसाद यादवांचा पलटवार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 10:19 IST

संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बुधवारी मोठा राजकीय भूकंप केला आहे.

पाटणा, दि. 27 - संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बुधवारी मोठा राजकीय भूकंप केला आहे. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी बुधवारी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान नितीश कुमार यांनी बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. यावरुन लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमारांवर हत्येचा आरोप करत पलटवार केला आहे. 

लालू यांनी पत्रकार परिषद घेत पुरावा म्हणून काही कागदपत्रं सादर केली. यावेळी लालू म्हणाले की, नितीश कुमार यांना अडचणीत येण्याचा अंदाज आला, यासाठी त्यांनी भाजपासोबत आधीच सेटिंग केले. येथे नितीश यांनी राजीनामा दिला तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाचं ट्विट केले.  हे सर्व काही सेटिंग असल्याचे सिद्ध होत आहे, असेही लालू म्हणाले.

लालू प्रसाद यादव पुढे असेही म्हणाले की, मी रात्रीदेखील नितीश यांच्यासोबत 40 मिनिटं संवाद साधला. मात्र त्यांनी कोणत्या प्रकारे राजीनाम्याची मागणी केली नव्हती. नितीश केवळ एवढंच म्हणाले की, आरोपांबाबत स्पष्टीकरण द्या, काहीही घाई नाही. यावर आम्ही म्हटले की आरोपांमध्ये त्रुटी आहेत, जेडीयू काही सीबीआय नाही. जे काही स्पष्टीकरण द्यायचे आहेत, ते सार्वजनिक करू, तपास यंत्रणांना सांगू. 

पुढे ते असेही म्हणाले की, नितीश कुमार यांना माहिती होते की, राजीनामा घेण्यासाठी काहीही आधार नाही. यावेळी लालूंनी नितीश कुमारांवर खळबळजनक आरोप करत सांगितले की, नितीश कुमार यांच्यावर 302 कलमांतर्गत आरोप करण्यात आलेत. त्यांना ही बाब माहिती होती देशातील पहिला असा मुख्यमंत्री आहे ज्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे आणि याची दखलही घेतली गेली आहे. या गुन्ह्यांतर्गत त्यांना आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. यावेळी लालू यांनी नितीश कुमार यांचं शपथपत्रदेखील सादर केले. हे प्रकरण पाटणा हायकोर्टात सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शिवाय, आता आपण वाचणार नाही, ही बाब नितीश यांना माहीत झाली होती. म्हणून त्यांनी आपला राजीनामा देण्याची खेळी खेळली. नितीश हे आरएसएस व भाजपासोबत मिळालेले आहे. 

लालूंनी पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणानितीश कुमारांना टीकास्त्र सोडण्यासोबत यावेळी लालूंनी पंतप्रधान मोदी व भाजपालाही टार्गेट केले. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्वरित ट्विट करत त्यांचे कौतुक केले. यावर लालू म्हणालेत की, काय सेटिंग आहे देशाच्या पंतप्रधानांची लगेच ट्विटदेखीस केले. भाजपाचे समर्थन घेणार का?, असे एका पत्रकारानं नितीश यांना विचारल्यानंतर त्यांनी नकार दर्शवला नाही. सर्व सेटिंग आहे. जाताना मी नितीश यांना म्हटलेदेखील, ''असे करू नका, जातीय शक्ती आपल्याला रोखू इच्छिते, त्यांच्याच मांडीवर जाऊन खेळू नका''.