शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आयटीतील लाखो होतील बेरोजगार !

By admin | Updated: July 6, 2016 01:05 IST

स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तुलनेने कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या ‘कुशल भारत’ मोहिमेला यामुळे धक्का लागणार आहे. एचएसएफ रिसर्च या संस्थेने हा अभ्यास केला आहे. अभ्यासांती जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि विदेशात मिळून आयटी क्षेत्रातील ९ टक्के नोकऱ्या यंत्रे संपवून टाकणार आहेत. यंत्रांमुळे गमावल्या जाऊ शकणाऱ्या या नोकऱ्यांची एकूण संख्या १.४ दशलक्ष इतकी आहे. एचएफएसने म्हटले की, कमी कुशल रोजगारांच्या उपलब्धतेत ३0 टक्क्यांनी घट होईल. याच वेळी मध्यम कुशल रोजगारांत ८ टक्क्यांची, तर उच्च प्रमाणात कुशल रोजगारांत ५६ टक्क्यांची वाढ होईल. (वृत्तसंस्था)कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवेनासकॉमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता गुप्ता यांनी सांगितले की, नव्याने निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांचा हिशेब एचएफएसच्या अभ्यासात घेतलेला दिसत नाही. स्वयंचलितीकरण आणि रोबोटिक्स यामुळे नेमका काय नफा-तोटा झाला, हे नेमकेपणे कोणीच पाहू शकत नाही. स्वयंचलित उपकरणांचा काही प्रमाणात परिणाम होतो. तथापि, नव्या तंत्रज्ञानाने नोकऱ्यांची निर्मितीच होते. प्रमाणापेक्षा कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अमुक इतक्या नोकऱ्या संपणार, असे म्हणणे चूक आहे. नोकऱ्या अन्यत्र निर्माण होतच असतात.बीपीओ उद्योगासमोर संकट...स्वयंचलितीकरणाचा फटका बीपीओ क्षेत्रास मोठ्या प्रमाणात बसेल. बीपीओ संस्था अँटवर्क्सचे सीईओ आशिष मेहरा यांनी सांगितले की, रोबोटिक प्रोसेस आॅटोमेशनमुळे म्हणजेच रोबोटकृत स्वयंचलित प्रक्रियेचा अवलंब वाढल्यामुळे येत्या दोन वर्षांत बीपीओ उद्योगासमोर संकट उभे राहील. कपातच नव्हे तर; नवे पदेही होणार तयारएचएफएस रिसर्चचे सीईओ फिल फ्रेश्ट यांनी सांगितले की, कमी गुणवत्तेची ३0 टक्के पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्याचे आम्ही नेमकेपणाने टिपले आहे. आगामी पाच वर्षांत ही पदे रद्द होत राहतील. त्याच वेळी मध्यम आणि उच्च गुणवत्तेची गरज असलेली नवी पदे तयार होतील. एचएफएसने १,४७७ कंपन्यांतील नियुक्त्यांचा कल अभ्यासून हा निष्कर्ष काढला आहे. 30%पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली