शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आयटीतील लाखो होतील बेरोजगार !

By admin | Updated: July 6, 2016 01:05 IST

स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तुलनेने कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या ‘कुशल भारत’ मोहिमेला यामुळे धक्का लागणार आहे. एचएसएफ रिसर्च या संस्थेने हा अभ्यास केला आहे. अभ्यासांती जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि विदेशात मिळून आयटी क्षेत्रातील ९ टक्के नोकऱ्या यंत्रे संपवून टाकणार आहेत. यंत्रांमुळे गमावल्या जाऊ शकणाऱ्या या नोकऱ्यांची एकूण संख्या १.४ दशलक्ष इतकी आहे. एचएफएसने म्हटले की, कमी कुशल रोजगारांच्या उपलब्धतेत ३0 टक्क्यांनी घट होईल. याच वेळी मध्यम कुशल रोजगारांत ८ टक्क्यांची, तर उच्च प्रमाणात कुशल रोजगारांत ५६ टक्क्यांची वाढ होईल. (वृत्तसंस्था)कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवेनासकॉमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता गुप्ता यांनी सांगितले की, नव्याने निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांचा हिशेब एचएफएसच्या अभ्यासात घेतलेला दिसत नाही. स्वयंचलितीकरण आणि रोबोटिक्स यामुळे नेमका काय नफा-तोटा झाला, हे नेमकेपणे कोणीच पाहू शकत नाही. स्वयंचलित उपकरणांचा काही प्रमाणात परिणाम होतो. तथापि, नव्या तंत्रज्ञानाने नोकऱ्यांची निर्मितीच होते. प्रमाणापेक्षा कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अमुक इतक्या नोकऱ्या संपणार, असे म्हणणे चूक आहे. नोकऱ्या अन्यत्र निर्माण होतच असतात.बीपीओ उद्योगासमोर संकट...स्वयंचलितीकरणाचा फटका बीपीओ क्षेत्रास मोठ्या प्रमाणात बसेल. बीपीओ संस्था अँटवर्क्सचे सीईओ आशिष मेहरा यांनी सांगितले की, रोबोटिक प्रोसेस आॅटोमेशनमुळे म्हणजेच रोबोटकृत स्वयंचलित प्रक्रियेचा अवलंब वाढल्यामुळे येत्या दोन वर्षांत बीपीओ उद्योगासमोर संकट उभे राहील. कपातच नव्हे तर; नवे पदेही होणार तयारएचएफएस रिसर्चचे सीईओ फिल फ्रेश्ट यांनी सांगितले की, कमी गुणवत्तेची ३0 टक्के पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्याचे आम्ही नेमकेपणाने टिपले आहे. आगामी पाच वर्षांत ही पदे रद्द होत राहतील. त्याच वेळी मध्यम आणि उच्च गुणवत्तेची गरज असलेली नवी पदे तयार होतील. एचएफएसने १,४७७ कंपन्यांतील नियुक्त्यांचा कल अभ्यासून हा निष्कर्ष काढला आहे. 30%पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली