शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही - अमिताभ कांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 02:25 IST

नवी दिल्ली : दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या आर्थिक शिखर परिषदेत बोलताना कांत म्हणाले की, पर्यटकांनी काय खावे आणिकाय प्यावे, यात राज्य सरकारांनी ...

नवी दिल्ली : दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या आर्थिक शिखर परिषदेत बोलताना कांत म्हणाले की, पर्यटकांनी काय खावे आणिकाय प्यावे, यात राज्य सरकारांनी पडण्याचे कारण नाही. पर्यटकांनी काय खावे, काय प्यावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा सरकारांशी काहीच संबंध नाही. ज्या राज्यांनी गोमांस आणि दारूवर बंदी घातली आहे, त्यांनी दुबईचे उदाहरण समजूनच घेतलेले नाही. देशाने व संबंधित राज्यांनी पर्यटकांना आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा पुरविण्याची गरज असते.अमिताभ कांत म्हणाले की, पर्यटन हा व्यवसाय मुळातच सुसंस्कृतता आणि सभ्यतेचा व्यवसाय आहे. एकीकडे कचरा आणि घाण यांचे ढिगारे असताना, आमच्याकडे महान वारसा स्थळे आहेत, असा दावा तुम्ही करूच शकत नाही. भारताने स्वच्छतेवर भर द्यायला हवा. दुसरे म्हणजे पर्यटकांसाठी भारतातील पर्यटन अविस्मरणीय व्हायला हवे.अलीकडेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आणि दमन या चार राज्यांनी दारूबंदीची योजना आखली आहे. गुजरात, बिहार, नागालँड आणि मणिपूर या राज्यांत यापूर्वीच दारूबंदी लागू आहे. दारूबंदीच्या समर्थकांच्या मते, जगात व्हिस्कीची सर्वाधिक विक्री भारतात होते. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय दारू पिऊन वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. या पार्श्वभूमीवर दारू पिणे, हीच एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर दारूबंदी हाच उपाय आहे.दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम होत आहे, हे आपले मत आपण राजकीय नेतृत्वाला सांगणार का, या प्रश्नावर कांत यांनी म्हटले की, मी हे वारंवार सांगत आलो आहे. आपल्या देशातील पर्यटन हा पर्यटकांसाठी एक चांगला अनुभव ठरायला हवा.दिवसभराचा थकवा घालविण्याची त्यांना गरज असते. भारतीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर योग्य आदरातिथ्य करून, त्याची संध्याकाळ तुम्ही अविस्मरणीय करायला हवी.

टॅग्स :Travelप्रवास