शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही - अमिताभ कांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 02:25 IST

नवी दिल्ली : दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या आर्थिक शिखर परिषदेत बोलताना कांत म्हणाले की, पर्यटकांनी काय खावे आणिकाय प्यावे, यात राज्य सरकारांनी ...

नवी दिल्ली : दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या आर्थिक शिखर परिषदेत बोलताना कांत म्हणाले की, पर्यटकांनी काय खावे आणिकाय प्यावे, यात राज्य सरकारांनी पडण्याचे कारण नाही. पर्यटकांनी काय खावे, काय प्यावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा सरकारांशी काहीच संबंध नाही. ज्या राज्यांनी गोमांस आणि दारूवर बंदी घातली आहे, त्यांनी दुबईचे उदाहरण समजूनच घेतलेले नाही. देशाने व संबंधित राज्यांनी पर्यटकांना आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा पुरविण्याची गरज असते.अमिताभ कांत म्हणाले की, पर्यटन हा व्यवसाय मुळातच सुसंस्कृतता आणि सभ्यतेचा व्यवसाय आहे. एकीकडे कचरा आणि घाण यांचे ढिगारे असताना, आमच्याकडे महान वारसा स्थळे आहेत, असा दावा तुम्ही करूच शकत नाही. भारताने स्वच्छतेवर भर द्यायला हवा. दुसरे म्हणजे पर्यटकांसाठी भारतातील पर्यटन अविस्मरणीय व्हायला हवे.अलीकडेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आणि दमन या चार राज्यांनी दारूबंदीची योजना आखली आहे. गुजरात, बिहार, नागालँड आणि मणिपूर या राज्यांत यापूर्वीच दारूबंदी लागू आहे. दारूबंदीच्या समर्थकांच्या मते, जगात व्हिस्कीची सर्वाधिक विक्री भारतात होते. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय दारू पिऊन वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. या पार्श्वभूमीवर दारू पिणे, हीच एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर दारूबंदी हाच उपाय आहे.दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम होत आहे, हे आपले मत आपण राजकीय नेतृत्वाला सांगणार का, या प्रश्नावर कांत यांनी म्हटले की, मी हे वारंवार सांगत आलो आहे. आपल्या देशातील पर्यटन हा पर्यटकांसाठी एक चांगला अनुभव ठरायला हवा.दिवसभराचा थकवा घालविण्याची त्यांना गरज असते. भारतीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर योग्य आदरातिथ्य करून, त्याची संध्याकाळ तुम्ही अविस्मरणीय करायला हवी.

टॅग्स :Travelप्रवास