शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही - अमिताभ कांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 02:25 IST

नवी दिल्ली : दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या आर्थिक शिखर परिषदेत बोलताना कांत म्हणाले की, पर्यटकांनी काय खावे आणिकाय प्यावे, यात राज्य सरकारांनी ...

नवी दिल्ली : दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या आर्थिक शिखर परिषदेत बोलताना कांत म्हणाले की, पर्यटकांनी काय खावे आणिकाय प्यावे, यात राज्य सरकारांनी पडण्याचे कारण नाही. पर्यटकांनी काय खावे, काय प्यावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा सरकारांशी काहीच संबंध नाही. ज्या राज्यांनी गोमांस आणि दारूवर बंदी घातली आहे, त्यांनी दुबईचे उदाहरण समजूनच घेतलेले नाही. देशाने व संबंधित राज्यांनी पर्यटकांना आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा पुरविण्याची गरज असते.अमिताभ कांत म्हणाले की, पर्यटन हा व्यवसाय मुळातच सुसंस्कृतता आणि सभ्यतेचा व्यवसाय आहे. एकीकडे कचरा आणि घाण यांचे ढिगारे असताना, आमच्याकडे महान वारसा स्थळे आहेत, असा दावा तुम्ही करूच शकत नाही. भारताने स्वच्छतेवर भर द्यायला हवा. दुसरे म्हणजे पर्यटकांसाठी भारतातील पर्यटन अविस्मरणीय व्हायला हवे.अलीकडेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आणि दमन या चार राज्यांनी दारूबंदीची योजना आखली आहे. गुजरात, बिहार, नागालँड आणि मणिपूर या राज्यांत यापूर्वीच दारूबंदी लागू आहे. दारूबंदीच्या समर्थकांच्या मते, जगात व्हिस्कीची सर्वाधिक विक्री भारतात होते. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय दारू पिऊन वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. या पार्श्वभूमीवर दारू पिणे, हीच एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर दारूबंदी हाच उपाय आहे.दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम होत आहे, हे आपले मत आपण राजकीय नेतृत्वाला सांगणार का, या प्रश्नावर कांत यांनी म्हटले की, मी हे वारंवार सांगत आलो आहे. आपल्या देशातील पर्यटन हा पर्यटकांसाठी एक चांगला अनुभव ठरायला हवा.दिवसभराचा थकवा घालविण्याची त्यांना गरज असते. भारतीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर योग्य आदरातिथ्य करून, त्याची संध्याकाळ तुम्ही अविस्मरणीय करायला हवी.

टॅग्स :Travelप्रवास