शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:35 IST

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस देशाचा विरोध करत पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचेही म्हटलं.

Shivraj Singh Chauhan on Rahul Gandhi: जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक असल्याची जाहीर कबुली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. ओबीसींच्या संरक्षणासाठी निर्णय घेण्यात मी कमी पडलो आणि आता ती चूक सुधारायची असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागितल्यानंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या नशिबात माफी मागणेच असल्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस देशाचा विरोध करत पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचेही म्हटलं.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करताना त्यांनी देशालाच विरोध करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस कारगिल विजय दिनावरही प्रश्न उपस्थित करते. ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित करून पाप करत असल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्र्‍यांनी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेबाबत केलेल्या विधानवरही भाष्य केलं.

"काँग्रेस कारगिल विजयावर प्रश्न उपस्थित करते. २००४ ते २००९ पर्यंत यूपीए सत्तेत असताना कारगिल विजय दिन साजरा केला गेला नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने तर असेही म्हटलं की, हे युद्ध एनडीए सरकारच्या काळात लढले गेले होते, त्यामुळे आपण तो का साजरा करावा. त्यामुळे मला प्रश्न  पडतो की जेव्हा एखादा देश युद्ध लढतो तेव्हा तो कोणत्याही सरकारसाठी लढतो का? असे प्रश्न उपस्थित करणे देशभक्ती आहे का?" असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.

"काँग्रेसने केवळ कारगिल युद्धावरच नव्हे तर ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित केले, जे चुकीचे आहे. काँग्रेस देशाचे नुकसान करण्यात गुंतलेली आहे आणि त्यांची विचारसरणी देशविरोधी बनली आहे. पंतप्रधान मोदींना विरोध करताना काँग्रेसने देशाचा विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांचे नेते पाकिस्तानसारखे बोलतात. पण आम्ही आमच्या सैन्याच्या शौर्याचे नेहमीच कौतुक करतो," असेही शिवराज सिंह चौहान म्हणाले.

"राहुल गांधींना गोष्टी उशिराने समजतात. आधी त्यांनी आणीबाणीसाठी माफी मागितली, नंतर शीख दंगलींसाठी माफी मागितली आणि आता त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली आहे. काँग्रेसने ओबीसींसाठी काय केले आहे ते सांगावे. मंडल आयोगाचा अहवाल कोणी फेटाळला हे काँग्रेसने सांगावे. एवढेच नाही तर काँग्रेसने ओबीसींच्या कल्याणासाठी प्रत्येक पाऊल चिरडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यासाठी माफी मागितली. याआधी राहुल गांधींनी राफेल प्रकरणात माफी मागितली होती आणि आता ते १० वर्षांनी जे करत आहेत त्यासाठी माफी मागतील. माफी मागणे त्यांच्या नशिबात लिहिलेले आहे," असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानOBC Reservationओबीसी आरक्षण