शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जैव, हरित इंधनाचा वापर करणे गरजेचे; पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 00:30 IST

‘इंडिया एनर्जी वीक’ आंतरराष्ट्रीय परिषदेत हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : कच्च्या तेलासह जीवाश्म इंधनाच्या सर्वाधिक मागणीची स्थिती येऊन त्यानंतर ती मागणी कधी कमी होत जाईल, हे सांगता येत नाही. ही स्थिती २०३५ दरम्यान येऊ शकते, असे काही तज्ज्ञ सांगतात. मात्र त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता, जैव व हरित इंधनाचा वापर करण्याची गरज असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केले.

येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्रात मंगळवारपासून सुरू झालेल्या चार दिवसीय ‘इंडिया एनर्जी वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत मांडले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. 

विहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन‘मुंबई हाय’जवळील सध्याची खनिज तेल उत्खनन क्षमता १.४२ लाख बॅरल प्रतिदिन आहे. ही क्षमता वाढवणे शक्य नाही. विस्तारासाठी नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आहे त्याच तेलविहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन कसे होऊ शकेल, याबाबत तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ब्रिटिश तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासंबंधी ओएनजीसीने ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार ‘मुंबई हाय’ या खनिज तेल उत्खनन क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उपाय केले जाणार आहेत.

बीपीसीएल पेट्रोब्रास यांच्यात करारभारताच्या ऊर्जा सुरक्षा प्रणालीनंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) ब्राझीलची राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोलियो ब्राझिलेरो एस. ए. (पेट्रोब्रास) सोबत ब्राझिलियन कच्चा तेलाच्या प्रकारांसाठी एक धोरणात्मक कालावधी करार केला आहे.