शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

जैव, हरित इंधनाचा वापर करणे गरजेचे; पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 00:30 IST

‘इंडिया एनर्जी वीक’ आंतरराष्ट्रीय परिषदेत हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : कच्च्या तेलासह जीवाश्म इंधनाच्या सर्वाधिक मागणीची स्थिती येऊन त्यानंतर ती मागणी कधी कमी होत जाईल, हे सांगता येत नाही. ही स्थिती २०३५ दरम्यान येऊ शकते, असे काही तज्ज्ञ सांगतात. मात्र त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता, जैव व हरित इंधनाचा वापर करण्याची गरज असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केले.

येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्रात मंगळवारपासून सुरू झालेल्या चार दिवसीय ‘इंडिया एनर्जी वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत मांडले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. पुरी म्हणाले की, २०१४ मध्ये इथेनॉलमिश्रित इंधनाची टक्केवारी १.४ होती. आता पंतप्रधानांनी यावर्षी ही टक्केवारी २० वर नेण्याची घोषणा केली. याप्रमाणेच पर्यायी इंधन स्रोतांकडे वाटचाल सुरू राहील व त्यासाठीच ही परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. 

विहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन‘मुंबई हाय’जवळील सध्याची खनिज तेल उत्खनन क्षमता १.४२ लाख बॅरल प्रतिदिन आहे. ही क्षमता वाढवणे शक्य नाही. विस्तारासाठी नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आहे त्याच तेलविहिरीतून अधिक क्षमतेचे उत्खनन कसे होऊ शकेल, याबाबत तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ब्रिटिश तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासंबंधी ओएनजीसीने ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार ‘मुंबई हाय’ या खनिज तेल उत्खनन क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उपाय केले जाणार आहेत.

बीपीसीएल पेट्रोब्रास यांच्यात करारभारताच्या ऊर्जा सुरक्षा प्रणालीनंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) ब्राझीलची राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोलियो ब्राझिलेरो एस. ए. (पेट्रोब्रास) सोबत ब्राझिलियन कच्चा तेलाच्या प्रकारांसाठी एक धोरणात्मक कालावधी करार केला आहे.