शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

काश्मीरमध्ये नि:पक्ष मिशन पाठविणे भारताला अमान्य

By admin | Updated: September 15, 2016 03:07 IST

काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील काश्मीरमध्ये

जिनिव्हा : काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील काश्मीरमध्ये एका स्वतंत्र, नि:पक्ष व आंतरराष्ट्रीय मिशनला भेटीची परवानगी देण्याची गरज आहे, या संयुक्त राष्ट्रसंघांच्या मानवी हक्क उच्चायुक्तांनी केलेल्या मागणीस भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.संयुक्त राषट्र संघाचे मानवी हक्क उच्चायुक्त झैद राद अल-हुसैन यांनी मानवी हक्क परिषदेच्या येथे भरलेल्या ३३ व्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी या अनुषंगाने केलेल्या प्रतिपादनावर भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील स्थायी प्रतिनिधी व राजदूत अजित कुमार यांनी कडाडून टिका केली.अजित कुमार म्हणाले की, काश्मीरकडे भारताचे व पाकिस्तानचे असे दोन तुकड्यांत पाहणे आम्हाला कदापि मान्य नाही. संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे व त्याचा काही हिस्सा पाकिस्तानने बेकायदा बळकावलेला आहे. शिवाय दोन्हींची तुलना होऊ शकत नाही. कारण भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये सर्व समाजवर्गांचे प्रतिनिधित्व करणारे लोकनियुक्त सरकार सत्तेवर आहे. पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमध्ये मात्र तशी स्थिती नाही.आंतरराष्ट्रीय मिशनला परवानगी देण्याचा आग्रह करताना झैद हुसैन यांनी काश्मीर खोऱ्यातील ताज्या हिंसाचाराचा संदर्भ दिला होता. त्यास तीव्र आक्षेप घेताना भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणाले की, सुरक्षा दलांच्या कारवाईत झालेल्या ज्याच्या मृत्यूमुळे हा हिंसाचार सुरु झाला तो आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिबंधित अशा दहशतवादी संघटनेचा प्रतिनिधी होता व या हिंसाचारास पाकिस्तानची चिथावणी आहे याचे सज्जड पुरावे भारताने दिलेले आहेत. असे असूनही संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनी सीमेच्या दोन्ही बाजूंकडील परिस्थितीची पाहणी करण्यास मिशन पाठविण्याची भाषा करावी यात या संघटनेतील प्रशासकीय संदिग्धताच दिसून येते. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता सुरळित होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)झैद राद अल-हुसैन असे म्हणाले होते: सीमेच्या दोन्ही बाजूंकडील काश्मीरमध्ये मानवी हक्कांची घोर पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यांची शहानिशा करण्यासाठी एका स्वतंत्र, नि:पक्ष आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास मिशनला तेथे जाऊन पाहणी करण्याची पूर्ण मुभा दोन्ही देशांनी देणे अगत्याचे आहे. दोन महिन्यांपूर्वी आम्ही यासाठी दोन्ही देशांकडे औपचारिक विनंती केली होती. भारताने त्यास अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. ९ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने मिशनला औपचारिक होकार कळविला. पण सीमेच्या दोन्ही बाजूंकडील पाहणी एकदमच व्हावी असे त्यांचे म्हणणे असल्याने मी भारताला पुन्हा एकदा त्यासाठी आवाहन करीत आहे.ईदच्या दिवशी संचारबंदी दुर्दैवी ईदच्या दिवशी लागू केलेली संचारबंदी दुर्दैवी होती; पण ती लागू करणे आवश्यक होऊन बसले होते. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयावर काही गटांनी रॅली काढण्याचे आवाहन केल्यानंतर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हा उपाय करणे गरजेचे होते, असे जम्मू- काश्मीरचे ज्येष्ठ मंत्री व सरकारी प्रवक्ते नईम अख्तर यांनी म्हटले आहे.