शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

असहिष्णूतेच्या मुद्यावर ओरडणा-यांना आणीबाणीचा विसर का पडला? जेटलींचा काँग्रेसवर हल्ला

By admin | Updated: November 27, 2015 13:54 IST

आणीबाणीच्या काळात देशातील नागरिकांचा जगण्याचा सर्वोच्च अधिकार हिसकावला गेल्याचा आरोप करत असहिष्णूतेच्या मुद्यावरून ओरडणा-या काँग्रेसला त्याचा विसर का पडला असा सवाल अरूण जेटलींनी केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - असहिष्णूतेच्या मुद्यावरून गोंधळ माजवणा-यांना आणीबाणीचे विसर का पडला असा सवाल विचारत अर्थमंत्री अरूण जेटलींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. देशात आणीबाणी लादणारे, त्याला पाठिंबा देणारे व लोकांच्या जगण्याचा अधिकार हिसकावणारे आज राज्यघटनेवर बोलत, देशात असहिष्णूता वाढल्याचा कांगावा करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला. संविधान दिनानिमित्त संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. 
राज्यघटनेच्या निर्मितीत ज्यांचे योगदान नाही, घटनेविषयी ज्यांना आस्था नाही तेच लोक त्याच्या वचनबद्धतेची चर्चा करीत त्याचे अग्रणीही बनू पाहत आहेत, असा आरोप काल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला होता. जेटली यांनी चर्चेच्या सुरूवातीलाच त्यांना उत्तर दिले. घटना समितीच्या स्थापनेनंतर चार-पाच वर्षांनी माझा जन्म झाल्याने आम्ही घटना स्थापन समितीत असणं शक्य नाही. पण जनसंघाचे संस्थाप ( आता भाजपा) श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीचे सदस्य होते, त्यांचेही देशाच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते, असे जेटली म्हणाले.
असहिष्णूतेच्या मुद्यावरून ओरडणा-या काँग्रेसला जेटलींनी आणीबाणीच्या काळाची आठवण करून दिली. काँग्रेस आज असहिष्णूतेच्या मुद्यावर आवाज उठवत आहे, मात्र ते इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीबद्दल विसरले का? असा सवाल जेटली यांनी केला. त्याकाळात घटनेतील  २१व्या कलमाची पायमल्ली करण्यात आली. तुम्ही आणीबाणी लागू करून विरोधकांना तुरूंगात डांबलं होतं, ते संपूर्ण दशकच हुकुमशाहीचं होतं असा आरोपही जेटली यांनी केला. मात्र सध्या देशात अशी (आणीबाणीसारखी) कोणतीही परिस्थिती नाहीये. आज एखादी व्यक्ती टीव्हीच्या कॅमे-यासमोर येऊन काही बोलली तरी देशातील वातावरण बिघडल्याची, असहिष्णूता वाढल्याची ओरड सुरू होते, असे जेटली म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवर आपले मत मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना कोणत्याही धर्माच्या बाजूने अथवा विरोधात नाही. घटनेतील कलम २५ नुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे आचरण करण्याचा तसेच त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. यातूनच धर्माच्या आधारे सरकारकडून कोणत्याही व्यक्तीत दुजाभाव केला जाऊ असेच डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते, असे जेटली म्हणाले. कोणतीही सरकारी संस्था लोकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांत हस्तक्षेप करू शकत नाही. स्वतंत्र न्यायव्यवस्था हे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचाच भाग असल्याचे त्यांनी म्हचल