शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोची पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी

By admin | Updated: May 28, 2017 22:11 IST

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला आजवरचा सर्वात शक्तिशाली अग्निबाण चाचणी उड्डाणासाठी सज्ज होत आहे.

ऑनलाइन लोकमतश्रीहरीकोटा, दि. 28 - यशस्वी झाल्यास ज्याच्या साह्याने भारतीय भूमीवरून पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठविणे शक्य होईल, असा भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला आजवरचा सर्वात शक्तिशाली अग्निबाण चाचणी उड्डाणासाठी सज्ज होत आहे.पूर्ण वाढ झालेल्या २०० आशियाई हत्तींएवढे किंवा प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या जंबो जेट विमानाहून पाचपट म्हणजे ६४० टन एवढे वजन असलेले ‘जिओरिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिएकल मार्क-३’ (जीएसएलव्ही-एमके-३) अशा नावाचा हा अग्निबाण सतीश धवन अंतराळ तळाच्या लॉन्चपॅडवर आणून उभा करण्यात आला असून मान्सूनपूर्वीच्या असह्य उन्हाळ््यातही ‘इस्रो’चे अभियंते तो पहिल्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज करीत आहेत.‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितले की, या अग्निबाणाचे लवकरच पहिले चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. अशी किमान सहा चाचणी उड्डाणे यशस्वी झाली तर पुढील दशकभरात हाच अग्निबाण वापरून भारतीय अग्निबाण वापरून भारतीय भूमीवरून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात धाडणेही शक्य होऊ शकेल.सरकारने ३-४ अब्ज डॉलर एवढ्या खर्चाला मंजुरी दिली की लगेच २/३ अंतराळवीरांना घेऊन याने अंतराळात सोडण्याची योजना ‘इस्रो’ने तयार केली आहे. यात यश आले तर मानवाला अंतराळात धाडण्याची वैज्ञानिक क्षमता असलेला भारत हा रशिया, अमेरिका व चीननंतर जगातील चौथा देश ठरेल. विशेष म्हणजे भारतातून अंतराळात पाठविली जाणारी पहिली अंतराळयात्री महिला असावी, अशी ‘इस्रो’ची तीव्र इच्छा आहे.मानवी अंतराळवारीखेरीज अधिक मोठे उपग्रह अंतराळात सोडण्याच्या दृष्टीनेही या प्रकारचा अग्निबाण भारताच्या दृष्टीने मोलाचा ठरेल. अशा अग्निबाणांच्या साह्याने चार टन वजनाचे उपग्रहही भूस्थिर कक्षेत नेऊन सोडणे शक्य होईल. अशा अग्निबाणास प्रत्येकी ३०० कोटी रुपये खर्च येणार असला तरी तो पुरेपुर वसूल होईल. कारण सध्या भारताला चार टन वर्गातील मोठे दळणवळण उपग्रह फ्रान्सच्या एरियान-५ अग्निबाणाने दक्षिण अमेरिकेतील कोऊरो येथून सोडावे लागतात. नवा अग्निबाण यशस्वी ठरला तर त्याने असे उपग्रह भारतातूनच कमी खर्चात सोडता येतील. शिवाय इतर देशांचे असे मोठे उपग्रह व्यापारी तत्वावर प्रक्षेपित करून अब्जावधी डॉलरच्या बाजारपेठेतही भारत आपला हिस्सा मिळवू शकेल.आत्तापर्यंत भारतास नवे अधिकाधिक क्षमतेचे अग्निबाण सिद्ध करताना आधी अनेक वेळा अपयश पचवावे लागले आहे. या अग्निबाणाच्या बाबतीत तसे होऊ नये यासाठी आमचे अभियंते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, असे कुमार म्हणाले.-------------------------नव्या अग्निबाणाची बलस्थाने- भारताने आत्तापर्यंत विकसित केलेल्या मोठ्या अग्निबाणांमध्ये या नव्या अग्निबाणाची उंची सर्वात कमी म्हणजे ४३ मीटर आहे.-असे असले तरी वजनाच्या दृष्टीने तो याआधीच्या जीएसएलव्ही एमके-२ च्या दीडपट व पीएसएलव्हीच्या दुप्पट वजनाचा आहे.-या अग्निबाणाचे डिझाईन रुबाबदार असून दोन ‘एसयूव्ही’ मोटारींएवढे वजन अंतराळात घेऊन जाण्याची त्याची क्षमता असेल.-याचा पहिला टप्पा आणि त्याला संलग्न असलेले ‘स्टार्ट-अप बूस्टर’ महाकाय असून त्यांचे वजन ६१० टन आहे. या पहिल्या टप्प्यात असलेली अनेक इंजिने एकाच वेळी चालू केली जाऊ शकतात.-याच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने पूर्णपणे देशात तयार केलेले ३० टन वजनाचे अभिनव असे ‘क्रायोजनिक इंजिन’ आहे.-अशा क्रायोजनिक इंजिनची पूर्ण अग्निबाणात बसवून प्रथमच चाचणी घेण्यात येणार आहे. यात पुढे रेटा देण्यासाठी ‘प्रॉपेलंट’ म्हणून द्रवरूप आॅक्सिजन व द्रवरूप हायड्रोजनचा प्रथमच वापर करण्यात येत आहे. १५ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.