शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

ISRO's 50 Years Journey: बैलगाडी ते मिशन चांद्रयान 2; असा होता ISRO चा 50 वर्षांचा सुवर्ण काळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 10:30 IST

ISRO's 50 Years Journey: हे वर्ष इस्त्रोसाठी महत्वाचे आहे कारण यंदा इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.

नवी दिल्ली - अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात भारताच्या वाटचालीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. 15 ऑगस्ट दिवशी संपूर्ण देश भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होतं. त्याचवेळी इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली. 5 दशकांपासून सुरु असणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन(ISRO) या प्रवासात अनेक महत्वाच्या चाचण्या पूर्ण करण्यास भारताला यश मिळालं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर इस्त्रोनेही विकासाच्या दृष्टीकोनातून मोठा टप्पा पार केला आहे. इस्त्रो हा पहिला प्रकल्प सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन एक्सपेरिमेंट होता. ज्यामधून भारताच्या ग्रामीण भागात टीव्ही पोहचणं शक्य होतं. सध्या इस्त्रो मच्छिमारांसाठी रियल टाइम सॅटेलाइट प्रयोग हाती घेत आहे. यंदाचं वर्ष इस्त्रोसाठी महत्वपूर्ण 

यावर्षी इस्त्रोने अनेक महत्वपूर्ण यश मिळविलं आहे. मिशन चांद्रयान 2 ने यशस्वीरित्या अंतराळात झेप घेतलं. मिशन चांद्रयान 2 वर फक्त  भारताची नव्हे तर जगभराचं लक्ष लागून राहिलं होतं. हे वर्ष इस्त्रोसाठी महत्वाचे आहे कारण यंदा इस्त्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. इस्त्रो सुवर्ण महोत्सव साजरा करतंय हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. तसेच इस्त्रोचे संस्थापक आणि भारताच्या अंतरिक्ष विज्ञानाचे जनक असणारे विक्रम साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. 

इस्त्रोच्या प्रवासात वेगळेपणा टिकून आहे की, त्यांनी भारतीय अंतरिक्ष विज्ञानात कोणताही प्रयोग करताना प्राधान्य सामान्य माणसांच्या जीवनात सुधारणा करण्यावर दिलं. जेव्हा भारतात अंतरिक्ष विज्ञानात प्रयोग करण्याचा काळ होता त्यावेळी वैज्ञानिकांना आपलं ध्येय स्पष्ट होतं. इस्त्रोच्या कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वी वलयाचा अभ्यास आणि संचार सुविधांमध्ये सुधारणा करणे होते. त्यावेळी विक्रम साराभाई यांनी भाषणात म्हटलं होतं की, आम्ही नागरिकांना चंद्रावर पाठविण्याचं स्वप्न बघत नाही, ना कोणत्या विविध ग्रहांचा अभ्यास करणं आमचं ध्येय आहे. भारतीय वैज्ञानिकांची महत्वकांक्षा यशस्वी होणं निराशावादी होणं ही निशाणी नाही तर वैज्ञानिकांनी भारतीय परिस्थिती समजून लक्ष्य गाठण्याचं ध्येय हवं. 

स्पेस एजेंसीचे सध्याचे चेअरमन के. सिवन यांनी साराभाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सांगितले की, साराभाई यांचे स्वप्न होतं की, अंतरिक्ष विज्ञान आणि विकल्पाचे प्रयोग हे सामान्य नागरिकांचे हित लक्षात ठेऊन केले पाहिजेत. हे वाक्य आजही इस्त्रोसाठी प्रेरणादायक आहे. आमचे सगळे प्रयोग त्याच दृष्टीकोनातून पुढे सुरु आहेत. ज्याचे यश सगळ्यांना आज दिसत आहे.

एक काळ असा होता की, इस्त्रोला त्यांच्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागत होतं. आपलं सॅटेलाइटचं निर्माण आणि त्याचे लॉन्चिंग यासाठी इस्त्रोला दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागलं. इस्त्रोने गेल्या 50 वर्षात अनेक प्रगती केली आणि भारत अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात जगातील अन्य देशांना मदत करत आहे. 15 फेब्रुवारी 2017 रोजी इस्त्रोने एकाच वेळी 104 सॅटेलाइट लॉन्च केले होते तो विश्वविक्रम भारताच्या नावावर आहे. यातील सर्वाधिक सॅटेलाइट दुसऱ्या देशांचे होते.  

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतscienceविज्ञानIndependence Dayस्वातंत्र्य दिन