शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:30 IST

Priyanka Gandhi And Israel Hamas War : गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या.

इस्रायल-हमासमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. यासोबतच युद्धबंदीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा असंही सांगितलं. 

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारत नेहमीच योग्य गोष्टींचं समर्थन करत आला आहे. आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी पॅलेस्टिनी जनतेचं नेहमीच समर्थन केलं आहे. गाझामध्ये अजूनही बॉम्बफेक सुरू आहे. अन्नधान्याचा मोठा तुटवडा झाला. वैद्यकीय सुविधा नष्ट केल्या गेल्या आणि सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठाही खंडित झाला आहे. संपूर्ण देश उद्ध्वस्त होत आहे."

"युद्धात 16,000 निष्पाप नागरिक मारले गेले आहेत, ज्यात 10,000 मुले, 60 पत्रकार आणि शेकडो वैद्यकीय कर्मचारी आहेत. हे आमच्यासारखे स्वप्न आणि अपेक्षा असलेले लोक आहेत. आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जात आहे. कुठे गेली आपली माणुसकी? आम्ही आमच्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींना त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात दीर्घकाळ समर्थन देत आहोत, पण आता आम्ही मागे आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काहीही करत नाही."

"आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्याने, जे योग्य आहे त्यासाठी उभे राहणे ही भारताची जबाबदारी आहे. शक्य तितक्या लवकर युद्धविराम सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्व शक्य प्रयत्न केले पाहिजेत" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास संघर्षामुळे गाझामधील मृतांची संख्या 16,200 च्या पुढे गेली आहे. आणि सुमारे 42,000 जखमी आहेत. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध