शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Priyanka Gandhi : "आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:30 IST

Priyanka Gandhi And Israel Hamas War : गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या.

इस्रायल-हमासमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. यासोबतच युद्धबंदीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा असंही सांगितलं. 

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारत नेहमीच योग्य गोष्टींचं समर्थन करत आला आहे. आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी पॅलेस्टिनी जनतेचं नेहमीच समर्थन केलं आहे. गाझामध्ये अजूनही बॉम्बफेक सुरू आहे. अन्नधान्याचा मोठा तुटवडा झाला. वैद्यकीय सुविधा नष्ट केल्या गेल्या आणि सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठाही खंडित झाला आहे. संपूर्ण देश उद्ध्वस्त होत आहे."

"युद्धात 16,000 निष्पाप नागरिक मारले गेले आहेत, ज्यात 10,000 मुले, 60 पत्रकार आणि शेकडो वैद्यकीय कर्मचारी आहेत. हे आमच्यासारखे स्वप्न आणि अपेक्षा असलेले लोक आहेत. आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जात आहे. कुठे गेली आपली माणुसकी? आम्ही आमच्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींना त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात दीर्घकाळ समर्थन देत आहोत, पण आता आम्ही मागे आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काहीही करत नाही."

"आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्याने, जे योग्य आहे त्यासाठी उभे राहणे ही भारताची जबाबदारी आहे. शक्य तितक्या लवकर युद्धविराम सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्व शक्य प्रयत्न केले पाहिजेत" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास संघर्षामुळे गाझामधील मृतांची संख्या 16,200 च्या पुढे गेली आहे. आणि सुमारे 42,000 जखमी आहेत. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध