शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

निवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार - इरॉम शर्मिला

By admin | Updated: August 11, 2016 10:14 IST

मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं सांगतिलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
इंफाळ, दि. 11 - मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण सोडले. उपोषणाने प्रश्न सुटणे आजच्या स्थितीत अवघड आहे, असे लक्षात आल्यामुळे आपण हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे इरॉम शर्मिला निवडणूक लढवणार असून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. उपोषण सोडताना आपली मणिपूर विधानसभा निवडणूक लढवण्याची आणि लग्न करण्याची इच्छा इरॉम शर्मिला यांनी व्यक्त केली होती. पण जर निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरॉम शर्मिला यांनी सांगितलं आहे. 
 
मणिपुरातून सुरक्षा दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट) मागे घेण्यात यावा, यासाठी बेमुदत उपोषण करणा-या इरॉम शर्मिला यांनी 9 ऑगस्टला उपोषण साडले आहे. २000 सालपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांपुर्वी त्यांनी आपण उपोषण मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. उपोषणाने प्रश्न सुटणे आजच्या स्थितीत अवघड आहे, असे लक्षात आल्यामुळे आपण हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते. 
 
 
मणिपूरमध्ये लष्कर विशेष अधिकार कायद्याचा वापर करुन अत्याचार, अन्याय करत आहे असा त्यांचा आरोप होता. मणीपूरची मुख्यमंत्री बनून मला जनतेची सेवा करायची आहे असे उपोषण सोडल्यानंतर इरॉमने सांगितले. मी मणीपूरची मुख्यमंत्री झाले तर, सर्वप्रथम मी लष्कराला विशेष अधिकार देणारा (AFSPA) कायदा रद्द करण्याचे काम करीन असे त्यांनी सांगितले. सध्याच्या कुठल्याही प्रस्थापित पक्षाबरोबर आपण जाणार नाही असेही इरॉम यांनी स्पष्ट केले. 
 
माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उपोषण करण्याऐवजी मी आता निवडणूक लढवून हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करीन असे इरॉम शर्मिला यांनी सांगितले होते. इरॉम नोव्हेंबर २००० पासून उपोषणाला बसल्या होत्या. इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर  एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या.