शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चित्रपट पुरस्कार वादाचा फटका बसला इराणींना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:16 IST

काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपट पुरस्काराच्या वादाचा फटका स्मृति इराणी यांना बसला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात इराणी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण खातेच काढून घेण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपट पुरस्काराच्या वादाचा फटका स्मृति इराणी यांना बसला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात इराणी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण खातेच काढून घेण्यात आले आहेत.इराणींकडे आता त्यांच्याकडे फक्त वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी असेल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ््याच्या वेळी राष्ट्रपती केवळ एक तासच या समारंभास उपस्थित राहाणार हे जाहीर झाल्यामुळे वाद पेटला होता. अनेक कलाकारांनी राष्ट्रपतींच्या हस्तेच पुरस्कार घेऊ नाहीतर समारंभावर बहिष्कार घालू अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी हा वाद तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री स्मृति इराणींना नीट हाताळता आला नाही. या प्रकरणी राष्ट्रपतींचीच भूमिका चुकीची आहे अशा स्वरुपाच्या बातम्या झळकल्या. तसेच या वादामुळे मोदी सरकारही अडचणीत आले. त्यामुळेही इराणी यांचे माहिती व प्रसारण खाते काढून घेण्यात आले अशी चर्चा आहे. तसेच काही दिवसांपूर्वी माध्यमांची मुस्कटदाबी करण्याची नियमावलीही त्यांनी केली होती. त्याच दिवशी त्यांना ती मागेही घ्यावी लागली होती. हे सर्व वादग्रस्त निर्णय इराणी यांना भोवले आहेत. आता त्यांच्याकडे केवळ वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कारभार उरला आहे.स्वराज यांचे मंत्रिपद कायम, जेटलींचे काढले गेलेसुषमा स्वराज यांच्यावरही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती पण तरीही त्यांच्या खात्याचा भार अन्य कोणावरही सोपविण्यात आला नव्हता. शस्त्रक्रियेनंतर स्वराज यांना पूर्ण बरे होण्यास तीन महिने लागले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे देखील गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहे. मात्र त्यांच्याही पदाचा भार अन्य मंत्र्यांवर सोपविण्यात आलेला नाही. मग अरुण जेटली यांच्या संदर्भातच मोदी यांनी असा निर्णय का घेतला अशी चर्चा आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर जेटली यांच्या खांद्यावर मंत्रीपदाची जबाबदारी नसल्यास कोणताही ताण न येता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारण्यास मदत होईल, असा विचार मोदी यांनी केला असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणी