शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चित्रपट पुरस्कार वादाचा फटका बसला इराणींना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:16 IST

काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपट पुरस्काराच्या वादाचा फटका स्मृति इराणी यांना बसला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात इराणी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण खातेच काढून घेण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झालेल्या चित्रपट पुरस्काराच्या वादाचा फटका स्मृति इराणी यांना बसला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात इराणी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण खातेच काढून घेण्यात आले आहेत.इराणींकडे आता त्यांच्याकडे फक्त वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी असेल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ््याच्या वेळी राष्ट्रपती केवळ एक तासच या समारंभास उपस्थित राहाणार हे जाहीर झाल्यामुळे वाद पेटला होता. अनेक कलाकारांनी राष्ट्रपतींच्या हस्तेच पुरस्कार घेऊ नाहीतर समारंभावर बहिष्कार घालू अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी हा वाद तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री स्मृति इराणींना नीट हाताळता आला नाही. या प्रकरणी राष्ट्रपतींचीच भूमिका चुकीची आहे अशा स्वरुपाच्या बातम्या झळकल्या. तसेच या वादामुळे मोदी सरकारही अडचणीत आले. त्यामुळेही इराणी यांचे माहिती व प्रसारण खाते काढून घेण्यात आले अशी चर्चा आहे. तसेच काही दिवसांपूर्वी माध्यमांची मुस्कटदाबी करण्याची नियमावलीही त्यांनी केली होती. त्याच दिवशी त्यांना ती मागेही घ्यावी लागली होती. हे सर्व वादग्रस्त निर्णय इराणी यांना भोवले आहेत. आता त्यांच्याकडे केवळ वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कारभार उरला आहे.स्वराज यांचे मंत्रिपद कायम, जेटलींचे काढले गेलेसुषमा स्वराज यांच्यावरही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती पण तरीही त्यांच्या खात्याचा भार अन्य कोणावरही सोपविण्यात आला नव्हता. शस्त्रक्रियेनंतर स्वराज यांना पूर्ण बरे होण्यास तीन महिने लागले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे देखील गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहे. मात्र त्यांच्याही पदाचा भार अन्य मंत्र्यांवर सोपविण्यात आलेला नाही. मग अरुण जेटली यांच्या संदर्भातच मोदी यांनी असा निर्णय का घेतला अशी चर्चा आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर जेटली यांच्या खांद्यावर मंत्रीपदाची जबाबदारी नसल्यास कोणताही ताण न येता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारण्यास मदत होईल, असा विचार मोदी यांनी केला असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणी