शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

मुंबई, चेन्नईसह 'ही' शहरं बुडण्याचा धोका; ४ कोटी भारतीयांसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:43 IST

वातावरण बदलाचा, तापमान वाढीचा मोठा फटका बसणार; कोट्यवधी भारतीयांवर मोठं संकट

वातावरण बदलाचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) ताज्या अहवालातून भारतासाठी अतिशय चिंताजनक माहिती समोर आली आहे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो. शतकाच्या शेवटापर्यंत भारतातील ४.५ ते ५ कोटी लोकांवर मोठं संकट असेल. मुंबई, चेन्नई, गोवा यासारखे समुद्र किनारी असलेले भाग बुडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. भारताच्या तीन बाजूंना समुद्र आहे. भारताला लाभलेला समुद्र किनारा ७,५१६ किलोमीटरचा आहे. या किनारपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या कोट्यवधी लोकांना समुद्राची पाणी पातळी वाढल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

सध्याच्या तापमानवाढीचा वेग लक्षात घेतल्यास मुंबई, चेन्नई, गोवा, विशाखापट्टणम, ओदिशा यांचा बराचसा भूभाग पाण्याखाली जाईल. या शहरांजवळ असलेल्या पाण्याचं तापमान ०.८ डिग्रीनं वाढल्यावर चक्रीवादळांची संख्या वाढेल. त्यांची तीव्रता वाढेल. वारंवार चक्रीवादळ येत राहतील. त्यामुळे मोठं नुकसान होईल. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा फटका बसत राहील.

समुद्राचं तापमान वाढत असल्याचा थेट परिणाम किनाऱ्यावर असलेल्या शहरांना सहन करावा लागेल. उष्णतेच्या लाटा येतील, मुसळधार पाऊस होईल. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्यानं काही भागांमध्ये परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे जाईल. दिल्ली, पाटणा, लखनऊ, हैदराबादमध्ये तापमान वाढेल. उष्णतेनं जीवाची काहिली होईल. थंडीच्या दिवसात पारा खूप घसरले. त्यामुळे थंडी असह्य होईल, असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो.