शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुंबई, चेन्नईसह 'ही' शहरं बुडण्याचा धोका; ४ कोटी भारतीयांसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:43 IST

वातावरण बदलाचा, तापमान वाढीचा मोठा फटका बसणार; कोट्यवधी भारतीयांवर मोठं संकट

वातावरण बदलाचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) ताज्या अहवालातून भारतासाठी अतिशय चिंताजनक माहिती समोर आली आहे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो. शतकाच्या शेवटापर्यंत भारतातील ४.५ ते ५ कोटी लोकांवर मोठं संकट असेल. मुंबई, चेन्नई, गोवा यासारखे समुद्र किनारी असलेले भाग बुडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. भारताच्या तीन बाजूंना समुद्र आहे. भारताला लाभलेला समुद्र किनारा ७,५१६ किलोमीटरचा आहे. या किनारपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या कोट्यवधी लोकांना समुद्राची पाणी पातळी वाढल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

सध्याच्या तापमानवाढीचा वेग लक्षात घेतल्यास मुंबई, चेन्नई, गोवा, विशाखापट्टणम, ओदिशा यांचा बराचसा भूभाग पाण्याखाली जाईल. या शहरांजवळ असलेल्या पाण्याचं तापमान ०.८ डिग्रीनं वाढल्यावर चक्रीवादळांची संख्या वाढेल. त्यांची तीव्रता वाढेल. वारंवार चक्रीवादळ येत राहतील. त्यामुळे मोठं नुकसान होईल. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा फटका बसत राहील.

समुद्राचं तापमान वाढत असल्याचा थेट परिणाम किनाऱ्यावर असलेल्या शहरांना सहन करावा लागेल. उष्णतेच्या लाटा येतील, मुसळधार पाऊस होईल. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्यानं काही भागांमध्ये परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे जाईल. दिल्ली, पाटणा, लखनऊ, हैदराबादमध्ये तापमान वाढेल. उष्णतेनं जीवाची काहिली होईल. थंडीच्या दिवसात पारा खूप घसरले. त्यामुळे थंडी असह्य होईल, असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो.