शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, चेन्नईसह 'ही' शहरं बुडण्याचा धोका; ४ कोटी भारतीयांसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:43 IST

वातावरण बदलाचा, तापमान वाढीचा मोठा फटका बसणार; कोट्यवधी भारतीयांवर मोठं संकट

वातावरण बदलाचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) ताज्या अहवालातून भारतासाठी अतिशय चिंताजनक माहिती समोर आली आहे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो. शतकाच्या शेवटापर्यंत भारतातील ४.५ ते ५ कोटी लोकांवर मोठं संकट असेल. मुंबई, चेन्नई, गोवा यासारखे समुद्र किनारी असलेले भाग बुडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. भारताच्या तीन बाजूंना समुद्र आहे. भारताला लाभलेला समुद्र किनारा ७,५१६ किलोमीटरचा आहे. या किनारपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या कोट्यवधी लोकांना समुद्राची पाणी पातळी वाढल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

सध्याच्या तापमानवाढीचा वेग लक्षात घेतल्यास मुंबई, चेन्नई, गोवा, विशाखापट्टणम, ओदिशा यांचा बराचसा भूभाग पाण्याखाली जाईल. या शहरांजवळ असलेल्या पाण्याचं तापमान ०.८ डिग्रीनं वाढल्यावर चक्रीवादळांची संख्या वाढेल. त्यांची तीव्रता वाढेल. वारंवार चक्रीवादळ येत राहतील. त्यामुळे मोठं नुकसान होईल. समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा फटका बसत राहील.

समुद्राचं तापमान वाढत असल्याचा थेट परिणाम किनाऱ्यावर असलेल्या शहरांना सहन करावा लागेल. उष्णतेच्या लाटा येतील, मुसळधार पाऊस होईल. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्यानं काही भागांमध्ये परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे जाईल. दिल्ली, पाटणा, लखनऊ, हैदराबादमध्ये तापमान वाढेल. उष्णतेनं जीवाची काहिली होईल. थंडीच्या दिवसात पारा खूप घसरले. त्यामुळे थंडी असह्य होईल, असं आयपीसीसीचा अहवाल सांगतो.