शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कचरा जाळणे ठरतेय आजारास निमंत्रण

By admin | Updated: February 22, 2016 00:02 IST

जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शहरातील कचर्‍याची विल्हेवाट व्यवस्थित व्हावी म्हणून मनपाच्या वतीने शहरात वेगवेगळ्या भागात कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. असे असले तरी यामध्ये मनपा व काही नागरिकांच्याही चुका कचर्‍याच्या विल्हेवाटीस बाधा ठरतात.
कचरा कुंड्या भरल्या तरी त्यामधील कचरा उचलला जात नाही तर दुसकीरकडे काही नागरिक कचरा कुंडीत न टाकता कुंडीच्या बाहेर टाकतात. त्यामुळे तो अस्ताव्यस्त पसरतो. या दोन्ही कारणांमुळे नागरिक हा कचरा उघड्यावरच जाळतात. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो, जो आरोग्यास हानीकारक आहे.
सामान्य आजाराकडे दुर्लक्ष करु नका...
कचरा जाळल्याने निघणार्‍या धुरामुळे सर्दी, डोके दुखणे, सतत नाक गळणे आणि सर्दीची ॲलर्जी असे आजार होतात. ते तसे सामान्य आजार वाटतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दमा होण्याची शक्यता...
सतत छातीमध्ये धूर गेल्याने श्वसनाचे आजार बळावतात. श्वसन क्रिया मंदावते, यामुळे सततचा खोकला, घशात खवखवणे असे घशाचेही आजार होतात. यामधून नंतर दमा सारखे गंभीर आजार होण्यास मदत मिळते. सोबतच अस्थमासारखेही आजार होतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

डोकेदुखी, डोळे जळजळणे...
धुराच्या उग्र वासाने डोके भणभणते, यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच डोळ्यात धूर गेल्याने डोळे चुळचुळ करतात. डोळ्यातून पाणी येते. हा धूर त्या परिसरातील घराघरात गेल्यावर त्याचा सर्वांना त्रास होऊन व तो घशावाटे पोटात गेल्याने पोटाचाही त्रास होतो. यामुळे वारंवार इन्फेक्शन होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.

ह्रदयावरील दाब वाढतो...
कचर्‍यामधून निघणारा धूर नाका, तोंडावाटे पोटात, छातीत गेल्याने ह्रदयावरील दाब वाढतो. त्यामुळे त्याचा ह्रदयावर परिणाम होतो. तसेच फुफ्फुसाचाही आजार बळावतात.
एकूणच उघड्यावर कचरा जाळल्याने साध्या आजारापासून गंभीर आजार होण्यास निमंत्रण मिळते. त्यामुळे उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरु शकते, म्हणून असे प्रकार टाळणेच योग्य असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नागरिकांच्याही आरोग्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाचट लावण्याची मागणी आहे.