शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

कचरा जाळणे ठरतेय आजारास निमंत्रण

By admin | Updated: February 22, 2016 00:02 IST

जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शहरातील कचर्‍याची विल्हेवाट व्यवस्थित व्हावी म्हणून मनपाच्या वतीने शहरात वेगवेगळ्या भागात कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. असे असले तरी यामध्ये मनपा व काही नागरिकांच्याही चुका कचर्‍याच्या विल्हेवाटीस बाधा ठरतात.
कचरा कुंड्या भरल्या तरी त्यामधील कचरा उचलला जात नाही तर दुसकीरकडे काही नागरिक कचरा कुंडीत न टाकता कुंडीच्या बाहेर टाकतात. त्यामुळे तो अस्ताव्यस्त पसरतो. या दोन्ही कारणांमुळे नागरिक हा कचरा उघड्यावरच जाळतात. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो, जो आरोग्यास हानीकारक आहे.
सामान्य आजाराकडे दुर्लक्ष करु नका...
कचरा जाळल्याने निघणार्‍या धुरामुळे सर्दी, डोके दुखणे, सतत नाक गळणे आणि सर्दीची ॲलर्जी असे आजार होतात. ते तसे सामान्य आजार वाटतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दमा होण्याची शक्यता...
सतत छातीमध्ये धूर गेल्याने श्वसनाचे आजार बळावतात. श्वसन क्रिया मंदावते, यामुळे सततचा खोकला, घशात खवखवणे असे घशाचेही आजार होतात. यामधून नंतर दमा सारखे गंभीर आजार होण्यास मदत मिळते. सोबतच अस्थमासारखेही आजार होतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

डोकेदुखी, डोळे जळजळणे...
धुराच्या उग्र वासाने डोके भणभणते, यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच डोळ्यात धूर गेल्याने डोळे चुळचुळ करतात. डोळ्यातून पाणी येते. हा धूर त्या परिसरातील घराघरात गेल्यावर त्याचा सर्वांना त्रास होऊन व तो घशावाटे पोटात गेल्याने पोटाचाही त्रास होतो. यामुळे वारंवार इन्फेक्शन होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.

ह्रदयावरील दाब वाढतो...
कचर्‍यामधून निघणारा धूर नाका, तोंडावाटे पोटात, छातीत गेल्याने ह्रदयावरील दाब वाढतो. त्यामुळे त्याचा ह्रदयावर परिणाम होतो. तसेच फुफ्फुसाचाही आजार बळावतात.
एकूणच उघड्यावर कचरा जाळल्याने साध्या आजारापासून गंभीर आजार होण्यास निमंत्रण मिळते. त्यामुळे उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरु शकते, म्हणून असे प्रकार टाळणेच योग्य असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नागरिकांच्याही आरोग्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाचट लावण्याची मागणी आहे.