शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

काँग्रेस अधिवेशनासाठी निष्ठावंतांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:20 IST

अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य व प्रदेश काँग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींचा पक्षाच्या अधिवेशनावर असलेला वरचष्मा दूर करण्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य व प्रदेश काँग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींचा पक्षाच्या अधिवेशनावर असलेला वरचष्मा दूर करण्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविले आहे. गाव तसेच ब्लॉक स्तरावरील निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांना दिल्लीत आयोजिलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी यांनी आमंत्रित केले आहे. पक्षाच्या अधिवेशनाच्याइतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, प्रदेश काँग्रेस समिती सदस्यांव्यतिरिक्त गाव वब्लॉक स्तरावरील जे कार्यकर्ते कधीही काँग्रेस पक्ष सोडून गेले नाहीत, त्यांची माहिती मिळविण्याचे आदेश राहुल गांधी यांनी विविध राज्यांचे प्रभारीपद सांभाळणाऱ्या पक्षाच्या महासचिवांना दिले. छोट्या राज्यांतून १० व मोठ्या राज्यांतून १५ निष्ठावान कार्यकर्त्यांना दिल्लीतील अधिवेशनास बोलाविण्याचे ठरले आहे. मात्र त्यांची माहिती जमविण्यात येत असल्याची कल्पना सुरवातीला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी राज्यांना नव्हती. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांना अधिवेशनाला उपस्थित राहाता येणे शक्य नव्हते. ही बाब राहुल गांधी यांना कळल्यानंतरत्यांनी संबंधित राज्यांच्या प्रभारी महासचिवांची कानउघाडणी केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना अधिवेशनालाघेऊन येण्याचे आदेश गुरुवारी रात्री त्यांनी प्रदेशाध्यक्षांना दिले. त्यामुळे युद्धपातळीवर शोधाशोध करुन विविध राज्यांतील काँग्रेसप्रदेशाध्यक्षांनी गाव व ब्लॉक स्तरावरील २०० निष्ठावंत कार्यकर्ते शोधून काढले. ते सर्व दिल्लीतील अधिवेशनाला उपस्थित राहतील.