शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

तपास सीबीआयकडे देणार

By admin | Updated: September 1, 2015 02:43 IST

प्रख्यात कन्नड लेखक आणि पुरोगामी विचारवंत डॉ. मल्लेशप्पा एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.

बेंगळुरू : प्रख्यात कन्नड लेखक आणि पुरोगामी विचारवंत डॉ. मल्लेशप्पा एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सोमवारी सीआयडीकडे तपास सोपविण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीबीआयकडे तपासाची शिफारस करण्याचे ठरले. कायदा व संसदीय कार्यमंत्री टी.बी. जयचंद्र यांनी पत्रकारांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. सीबीआयने तपास हाती घेण्याची औपचारिकता पूर्ण होईपर्यंत सीआयडीकडे तपासाची सूत्रे राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कलबुर्गी यांची रविवारी धारवाड येथील त्यांच्या निवासस्थानी दोन बंदूकधाऱ्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाने हल्लेखोरांच्या त्वरित अटकेसाठी राज्यव्यापी आंदोलन चालविले आहे. ही घटना घडायला नको होती. डॉ. कलबुर्गी यांची हत्या अत्यंत निंदनीय आहे, असे सिद्दरामय्या यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले. कोल्हापूरचे पुरोगामी विचारवंत कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्याशी निकटचे संबंध राहिलेल्या ७७ वर्षीय कलबुर्गी यांनाही त्याच पद्धतीने संपविण्यात आल्याने संतापाची भावना बळावत आहे. कलबुर्गी हे नेहमी अंधश्रद्धेविरुद्ध बोलायचे.त्यांनी हिंदू देव-देवतांबद्दल वादग्रस्त विधाने करीत विहिंप आणि बजरंग दलासारख्या कडव्या उजव्या संघटनांचा राग ओढवून घेतला होता. धारवाड येथे सोमवारी असंख्य चाहत्यांनी कलबुर्गी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दारावर थाप पडली असता ते उघडणाऱ्या कलबुर्गी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यांच्या कपाळ आणि छातीत गोळ्या घुसल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. या हत्येप्रकरणी सर्वांगाने तपास सुरू करण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी दिली आहे.(वृत्तसंस्था)—————————————————————————वादग्रस्त टिष्ट्वटमुळे खळबळहिंदुत्वाला विरोध करणाऱ्या यू.आर. अनंतमूर्ती आणि आता एम.एम. कलबुर्गी यांना कुत्र्याचे मरण मिळाले आहे. आता आदरणीय के.एस. भगवान यांचा नंबर लागेल, असे टिष्ट्वट बजरंग दलाच्या बांटवाल सेलचा नेता भूवित शेट्टी याने केल्यानंतर खळबळ उडाली आहे. शेट्टीविरुद्ध मंगळूर पोलिसांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे आणि गुन्हेगारी कृत्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. मी माझा राग व्यक्त केला असून मी किंवा माझ्या संघटनेतील कुणी त्यांची हत्या केली असा त्याचा अर्थ काढता येत नाही, असा खुलासाही त्याने केला आहे. भगवान यांची वादग्रस्त विधाने पाहता त्यांना हिंदुत्ववादी संघटनांकडून लक्ष्य ठरविले जाऊ शकते. आमच्या संघटनेचे लोक त्यांची हत्या करतील असा त्याचा अर्थ होत नाही, असेही शेट्टीने टिष्ट्वटरवर नमूद केले.———————————-विचारवंतांचा खून निषेधार्हच - सदानंद मोरेपुणे : तालिबानीकरणाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच आहे, असा समज होता. पण ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. मल्लेशाप्पा एम. कलबुर्गी यांच्या हत्येमुळे हे लोण महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून बाहेर गेल्याचे दिसते आहे. लोकशाहीत विचारवंतांचा खून होणे अयोग्यच आहे, अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.कलबुर्गी यांनी सुरक्षा नाकारली म्हणून हत्या झाली, असे म्हटले जात आहे. संरक्षण तरी किती लोकांना पुरविणार? असे प्रकार केवळ संरक्षण देऊन थांबणारे नाहीत. अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे. अशा घटना घडू नयेत, म्हणून योग्य ती यंत्रणा उभारली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.