शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

असहिष्णुता : लोकसभेचे कामकाज चार वेळा तहकूब

By admin | Updated: December 1, 2015 09:08 IST

असहिष्णुतेच्या मुद्यावर लोकसभेत सुरू झालेल्या चर्चेला सुरुवातीलाच वेगळे वळण लागले. मोदी सत्तेवर आल्यानंतर एका ठिकाणी बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पृथ्वीराज चौहान

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

असहिष्णुतेच्या मुद्यावर लोकसभेत सुरू झालेल्या चर्चेला सुरुवातीलाच वेगळे वळण लागले. मोदी सत्तेवर आल्यानंतर एका ठिकाणी बोलताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर ८00 वर्षांनी भारतात कोणी हिंदु शासक आला आहे’ असे उद्गार काढले होते, असा आरोप माकप खासदार मोहम्मद सलिम यांनी करताच गृहमंत्री चांगलेच व्यथित झाले. खा. सलीम यांचे वाक्य कामकाजातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली, मात्र त्यास विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल्याने एकच गदारोळ झाला. त्यामुळे दिवसभरात चारवेळा कामकाज तहकूब करावे लागले.अधिवेशनात आता केंद्र सरकारच्या दृष्टिने अत्यंत संघर्षाचा काळ सुरू झाला आहे, याची चुणूक सभागृहातल्या तणावात जाणवत होती.लोकसभेत असहिष्णुतेच्या चर्चेचा प्रारंभ करतांना आऊटलूक नियतकालिकाचा अंक सभागृहात सादर करीत व त्यातल्या लेखाचा हवाला देत मार्क्सवादी सदस्य मोहम्मद सलीम म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गृहमंत्रीच म्हणतात, की ८00 वर्षांच्या गुलामीनंतर भारतात हिंदू शासक सत्तेत परतला आहे. रा.स्व. संघाच्या बैठकीत ते असे बोलल्याचा उल्लेख या नियतकालिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात आहे. सलीम यांच्या वाक्यावर गृहमंत्री सिंह यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘खासदार मोहम्मद सलीम यांच्या आरोपाने आज मी जितका व्यथित झालो, तितका आयुष्यात कधीच झालो नाही. प्रत्येक वाक्य मी कायम जपूनच बोलतो. खासदारांनाच नव्हे तर अल्पसंख्य समुदायालाही याची कल्पना आहे’, असे उद्गार गृहमंत्र्यांनी सभागृहाला ऐकवले.त्यावर खा, सलीम म्हणाले, गृहमंत्री म्हणतात की हे वाक्य ते बोललेच नाहीत, मग माझा इतकाच सवाल आहे की मजकूर प्रसिध्द झाल्यानंतर गेले १५ दिवस त्याचे गृहमंत्र्यांनी खंडन का केले नाही? तमाम गुप्तचर यंत्रणा हाताशी आहेत. कोणीच याविषयी तुम्हाला कसे कळवले नाही? माहिती खोटी असेल तर संबंधित पत्रकाराला कायदेशीर नोटीस का पाठवली नाही? केंद्र सरकारवर चौफेर हल्ला चढवीत सलीम म्हणाले, असहिष्णुतेचा माहोल देशात वेगाने वाढतो आहे. आपली असहमती व्यक्त करण्यासाठी मान्यवर लेखक, साहित्यिक, वैज्ञानिक, कलाकार, इतिहासतज्ज्ञ आपले पुरस्कार परत करीत आहेत. हे पुरस्कार त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची पूंजी आहे. त्यांचा उपहास करतांना सत्ताधारी म्हणतात ही कृत्रिम असहमती आहे. हे बोलून तुम्ही कोणाचा अपमान करता आहात? अपमान करणाऱ्यांबरोबर त्याचा निषेध करणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. असहिष्णुतेचा साक्षात्कार घडवणारे लोक मुख्यत्वे सत्तेशी संबंधित आहेत. त्यात केंद्रातले मंत्री आणि सत्ताधारी खासदारही आहेत. त्यांना कोणी आवरणार आहे की नाही, असा सवाल खा. सलिम यांनी केला. सलिम यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप सत्ताधारी सदस्यांच्या वर्मावर घाव घालणारे ठरले. सभागृहात भाजपचे बहुतांश सदस्य आरडाओरड करीत आपल्या संतापाचे प्रदर्शन घडवीत होते. एका नियतकालिकातील मजकुराच्या भरवशावर सलूम यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केला आहे, त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, तरच सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल, असा आग्रह संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी वारंवार करीत होते. त्यावर सलीम म्हणाले, व्यक्तिश: राजनाथसिंहांविषयी मला आदर आहे. मोदींऐवजी ते पंतप्रधान झाले असते तर मला नक्कीच आवडले असते!असहिष्णुतेच्या मुद्यावर सुरू झालेल्या चर्चेला वेगळे वळण लागत असल्याचे पाहून लोकसभा लोकसभाध्यक्षांनी चारदा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.