शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा नियमितपणे सुरू होणार; २७ मार्चपासून परवानगी देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:59 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना संख्येत घट होत असल्याने ही घोषणा करण्यात आली.  

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती. जुलै २०२० पासून, एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि ३७ देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, नवीन आदेशानुसार एअर बबल प्रणालीही संपुष्टात येईल.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली पडझड यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महाग झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ तसेच मालवाहतुकीला गती मिळणार आहे.    - सुनीत कोठारी, अध्यक्ष, नागरी     विमान वाहतूक समिती, औरंगाबाद     पर्यटन विकास प्रतिष्ठान. (एटीडीएफ)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळ