शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा नियमितपणे सुरू होणार; २७ मार्चपासून परवानगी देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:59 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना संख्येत घट होत असल्याने ही घोषणा करण्यात आली.  

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती. जुलै २०२० पासून, एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि ३७ देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, नवीन आदेशानुसार एअर बबल प्रणालीही संपुष्टात येईल.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली पडझड यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महाग झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ तसेच मालवाहतुकीला गती मिळणार आहे.    - सुनीत कोठारी, अध्यक्ष, नागरी     विमान वाहतूक समिती, औरंगाबाद     पर्यटन विकास प्रतिष्ठान. (एटीडीएफ)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळ