शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा नियमितपणे सुरू होणार; २७ मार्चपासून परवानगी देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:59 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना संख्येत घट होत असल्याने ही घोषणा करण्यात आली.  

कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती. जुलै २०२० पासून, एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि ३७ देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, नवीन आदेशानुसार एअर बबल प्रणालीही संपुष्टात येईल.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली पडझड यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महाग झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ तसेच मालवाहतुकीला गती मिळणार आहे.    - सुनीत कोठारी, अध्यक्ष, नागरी     विमान वाहतूक समिती, औरंगाबाद     पर्यटन विकास प्रतिष्ठान. (एटीडीएफ)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळ