शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

इस्लामिक स्टेटबद्दल तरूणांना वाटणारे आकर्षण चिंताजनक - राजनाथ सिंह

By admin | Updated: November 29, 2014 12:13 IST

भारतातील तरूण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेला भुलून त्याकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी २९ -  भारतातील तरूण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेला भुलून त्याकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तरूणांना कट्टर धर्मवेडाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणा-या या संघटनेचे देशासमोर मोठे आव्हान उभे आहे, असेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तान गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या ४९व्या परिषदेदरम्यान ते बोलत होते. आयएसमध्ये सामिल होण्यासाठी गेलेला कल्याणमधील चार तरूणांपैकी एक तरूण कालच भारत परत आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. अशा तरूणांची ओळख पटवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 
यावेळी त्यांनी पोलिसांना  पाकिस्तानमधील काही शक्ती भारतात अस्थिरत माजवायचा प्रयत्न करत असल्याचे सांगत दहशतवादी संघटना अल-कायदाबद्दलही सतर्क राहण्याची सूचना दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदूसोबतच मुसलमानांनीही मोठे योगदान दिले असून अल-कायदाचे मनसुबे हाणून पाडू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी  त्यांनी यावेळी केला. देशातील सुरक्षा व्यवस्था कोणतेही आक्रमण थोपवून धरम्यासाठी सक्षम असल्याचेही ते म्हणाले. 
दरम्यान बर्दवान येथील स्फोटांचा छडा लावण्यात पश्चिम बंगाल पोलिस व एनआयएला यश मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.