शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:22 IST

मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे.

मुंबई : मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे. विपश्यना पद्धतीतूनच बुद्धांना बोधीतत्त्व, बोधीसत्त्व आणि करुणाभावाचा परिचय झाला. त्यामुळे बुद्धविचार जगापर्यंत पोहोचविण्यात विपश्यना पद्धती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगाला बुद्धविचारांकडे नेण्यासाठी विपश्यनेचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्या ४६ व्या तर इलायची देवी गोयंका यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्ताने आयोजित ‘आभार दिवस’ या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सविता कोविंद व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पॅगोडा येथील धम्मालयाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख आहे. मात्र, अध्यात्म आणि आस्था दर्शविणाºया परंपरेने महाराष्ट्राची सर्वाधिक प्रसिद्धी झाली. जागतिक पर्यटकांना आकर्षित करणाºया, बुद्धविचार सांगणाºया अजिंठाच्या लेणी त्याला साक्षी आहेत. बुद्धाने सांगितलेला करुणाभाव व्यक्त करणारे हे शिल्प जगाला करुणेचा संदेश देते. इगतपुरी येथील धम्म केंद्र, नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस व गोराई येथील जागतिक पॅगोडा या क्षेत्रामुळे जागतिक पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.विपश्यना साधनेमुळे जीवनातील तणाव दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात, अधिकाºयांना कामकाजात आणि खेळाडूंना खेळात उत्तम प्रगती करता येते. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला या साधनेमुळे लाभ मिळत असल्याने विपश्यना साधना ही संपूर्ण समाजासाठी हितकारी आहे. राज्य सरकारने शालेय विद्यार्थी, कारागृहांमधील कैदी तसेचशासकीय कर्मचाºयांना विपश्यनेसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेतहे उल्लेखनीय असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. दान दिलेल्या रकमेतून१६ एकर जागेवर ग्लोबल पॅगोडाउभे आहे. यावेळी नव्या बांधण्यात येणाºया धम्मालयाच्या शिलालेखाचेअनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून - मुख्यमंत्रीविपश्यना ही स्वत:ला अंतर्मुख करणारी भारतीय परंपरा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. कालांतराने ही परंपरा भारतातूनच लुप्त झाली. मात्र, विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांनी म्यानमारमध्ये हेच ज्ञान शुद्धरूपात जतन करून ठेवले होते. गोयंका गुरुजींनी ते परत भारतात आणले आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. आंतरिक ज्ञानाच्या ताकदीमुळे मानवाचे कल्याण साधता येते. मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून होत आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी पॅगोडाची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद