शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:22 IST

मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे.

मुंबई : मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे. विपश्यना पद्धतीतूनच बुद्धांना बोधीतत्त्व, बोधीसत्त्व आणि करुणाभावाचा परिचय झाला. त्यामुळे बुद्धविचार जगापर्यंत पोहोचविण्यात विपश्यना पद्धती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगाला बुद्धविचारांकडे नेण्यासाठी विपश्यनेचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्या ४६ व्या तर इलायची देवी गोयंका यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्ताने आयोजित ‘आभार दिवस’ या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सविता कोविंद व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पॅगोडा येथील धम्मालयाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख आहे. मात्र, अध्यात्म आणि आस्था दर्शविणाºया परंपरेने महाराष्ट्राची सर्वाधिक प्रसिद्धी झाली. जागतिक पर्यटकांना आकर्षित करणाºया, बुद्धविचार सांगणाºया अजिंठाच्या लेणी त्याला साक्षी आहेत. बुद्धाने सांगितलेला करुणाभाव व्यक्त करणारे हे शिल्प जगाला करुणेचा संदेश देते. इगतपुरी येथील धम्म केंद्र, नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस व गोराई येथील जागतिक पॅगोडा या क्षेत्रामुळे जागतिक पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.विपश्यना साधनेमुळे जीवनातील तणाव दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात, अधिकाºयांना कामकाजात आणि खेळाडूंना खेळात उत्तम प्रगती करता येते. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला या साधनेमुळे लाभ मिळत असल्याने विपश्यना साधना ही संपूर्ण समाजासाठी हितकारी आहे. राज्य सरकारने शालेय विद्यार्थी, कारागृहांमधील कैदी तसेचशासकीय कर्मचाºयांना विपश्यनेसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेतहे उल्लेखनीय असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. दान दिलेल्या रकमेतून१६ एकर जागेवर ग्लोबल पॅगोडाउभे आहे. यावेळी नव्या बांधण्यात येणाºया धम्मालयाच्या शिलालेखाचेअनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून - मुख्यमंत्रीविपश्यना ही स्वत:ला अंतर्मुख करणारी भारतीय परंपरा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. कालांतराने ही परंपरा भारतातूनच लुप्त झाली. मात्र, विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांनी म्यानमारमध्ये हेच ज्ञान शुद्धरूपात जतन करून ठेवले होते. गोयंका गुरुजींनी ते परत भारतात आणले आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. आंतरिक ज्ञानाच्या ताकदीमुळे मानवाचे कल्याण साधता येते. मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून होत आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी पॅगोडाची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद