शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

बुद्धविचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:22 IST

मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे.

मुंबई : मानव समाजाला हिंसेकडून करुणेकडे नेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणारा हा कालखंड आहे. सर्वांप्रति करुणाभाव ठेवणे हेच तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे सार आहे. विपश्यना पद्धतीतूनच बुद्धांना बोधीतत्त्व, बोधीसत्त्व आणि करुणाभावाचा परिचय झाला. त्यामुळे बुद्धविचार जगापर्यंत पोहोचविण्यात विपश्यना पद्धती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगाला बुद्धविचारांकडे नेण्यासाठी विपश्यनेचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्या ४६ व्या तर इलायची देवी गोयंका यांच्या द्वितीय स्मरणदिनानिमित्ताने आयोजित ‘आभार दिवस’ या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सविता कोविंद व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पॅगोडा येथील धम्मालयाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख आहे. मात्र, अध्यात्म आणि आस्था दर्शविणाºया परंपरेने महाराष्ट्राची सर्वाधिक प्रसिद्धी झाली. जागतिक पर्यटकांना आकर्षित करणाºया, बुद्धविचार सांगणाºया अजिंठाच्या लेणी त्याला साक्षी आहेत. बुद्धाने सांगितलेला करुणाभाव व्यक्त करणारे हे शिल्प जगाला करुणेचा संदेश देते. इगतपुरी येथील धम्म केंद्र, नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस व गोराई येथील जागतिक पॅगोडा या क्षेत्रामुळे जागतिक पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.विपश्यना साधनेमुळे जीवनातील तणाव दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात, अधिकाºयांना कामकाजात आणि खेळाडूंना खेळात उत्तम प्रगती करता येते. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला या साधनेमुळे लाभ मिळत असल्याने विपश्यना साधना ही संपूर्ण समाजासाठी हितकारी आहे. राज्य सरकारने शालेय विद्यार्थी, कारागृहांमधील कैदी तसेचशासकीय कर्मचाºयांना विपश्यनेसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेतहे उल्लेखनीय असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. दान दिलेल्या रकमेतून१६ एकर जागेवर ग्लोबल पॅगोडाउभे आहे. यावेळी नव्या बांधण्यात येणाºया धम्मालयाच्या शिलालेखाचेअनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून - मुख्यमंत्रीविपश्यना ही स्वत:ला अंतर्मुख करणारी भारतीय परंपरा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. कालांतराने ही परंपरा भारतातूनच लुप्त झाली. मात्र, विपश्यनाचार्य सयाजी ऊ बा खिन यांनी म्यानमारमध्ये हेच ज्ञान शुद्धरूपात जतन करून ठेवले होते. गोयंका गुरुजींनी ते परत भारतात आणले आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. आंतरिक ज्ञानाच्या ताकदीमुळे मानवाचे कल्याण साधता येते. मानवकल्याणाचा मार्ग विपश्यनेच्या माध्यमातून होत आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी पॅगोडाची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद