शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसी नसल्यास वाहनांच्या विमा पॉलिसीचं होणार नाही नूतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:39 IST

नवी दिल्ली, दि. 10 - वाढत्या नागरीकरणानं वाहतुकीच्या समस्येनं डोकं वर काढलं असताना त्यातच दिवसागणिक वाहनांच्या संख्येने भर पडत आहे. त्यामुळे प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. जर तुम्हाला वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करायचं आहे, तर ...

नवी दिल्ली, दि. 10 - वाढत्या नागरीकरणानं वाहतुकीच्या समस्येनं डोकं वर काढलं असताना त्यातच दिवसागणिक वाहनांच्या संख्येने भर पडत आहे. त्यामुळे प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. जर तुम्हाला वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करायचं आहे, तर तुमच्याजवळ पीयूसी असणं गरजेचं आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं आहे. तुमच्याकडे गाडीची पीयूसी नसेल तर तुमच्या वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण होणार नाही. वाहनातून होणा-या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करायचं असल्यास वाहनाच्या मालकाजवळ पीयूसी असणं अनिवार्य आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्याचं पालन व्हावं, यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या समितीनं वाहन विमा पॉलिसी कंपन्यांना आदेश दिले आहेत की, पीयूसी नसलेल्या वाहनांच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करू नका. न्यायमूर्ती मदन बी लोकूर समितीनं पॉल्युशन अंडर कंट्रोल (पीयूसी) केंद्रासाठी ऑल इंडिया रिअल टाइम ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जेव्हा वाहनधारक पीयूसी घेईल, त्यावेळी त्यामध्ये कोणताही घोटाळा होणार नाही.पीयूसी नसेल तर सी-लिंकवर ‘नो एन्ट्री’

वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व वाहनचालकांकडे पीयूसी असणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाकडे ब-याचदा वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येतेय. त्यामुळेच आता राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंबई मध्य (ताडदेव) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पीयूसी तपासणीसाठी विशेष मोहीम जून महिन्यात राबविण्यात येणार आहे. ज्या वाहनांकडे ‘पीयूसी’ नसेल अशा वाहनांना वांद्रे-वरळी सागरी सेतूवर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.