शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आधीच्या रोगाचे कारण दाखवून विम्याची भरपाई नाकारता येणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 02:11 IST

ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल

नवी दिल्ली : आधीपासून असलेल्या रोगाचे कारण दाखवून एखाद्या व्यक्तीच्या विम्याची भरपाई विमा कंपन्यांना नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जळगावातील एका प्रकरणात दिला.

निकालात म्हटले की, एखादा विमाधारक व्यक्ती विशिष्ट आजाराने ग्रस्त असेल पण त्याची त्याला माहिती नसेल, त्या आजारावर त्याने काहीही उपचार घेतले नसतील अशा स्थितीत त्या रुग्णाच्या विम्याची भरपाईची रक्कम नाकारता येणार नाही. मधुमेहाच्या आजाराने रेखा हल्दर या महिलेचे २४ जून २०११ रोजी निधन झाले. रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने १२ जुलै २०१० रोजी त्यांची मेडिक्लेम पॉलिसी काढली होती. रेखा यांच्या निधनानंतर त्यांच्या पतीने विम्याच्या रकमेसाठी केलेला दावा कंपनीने नाकारला. रेखा यांच्या पतीने त्याविरोधात जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर रेखा यांच्या पतीस १,१२,५०० रुपये भरपाई देण्याचा आदेश मंचाने दिला. या निकालाच्या पुनर्विचारासाठी रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने केलेला अर्ज महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगानेही फेटाळून लावला. त्यामुळे रिलायन्सने राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागितली होती.

जीवनशैलीशी निगडित आजारआयोगाने म्हटले की, विमा घेण्याआधी काही आजार होता की नव्हता हे सिद्ध करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. केवळ या कारणापायी कंपनी भरपाई नाकारू शकत नाही.