शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन, पानटपरी सुरू करावी; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:09 IST

सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.

आगरतळा : सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन करावे किंवा पानटपरी सुरु करावी, अशी मुक्ताफळे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी उधळली आहेत. भाजपा नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवरून वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावलेला असतानाच बिप्लव देव यांनी त्यांना आणखी एका विधानाची भर टाकली आहे. त्रिपुरातील एका चर्चासत्राचे उद्घाटन करताना बिप्लव देव पुढे म्हणाले की, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी युवक अनेक वर्षे राजकारण्यांच्या मागे धावत असतात. त्यामुळे या युवकांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात. त्याऐवजी त्यांनी पानटपरीचा धंदा केला असता तर एव्हाना त्या प्रत्येक युवकाच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपर्यंत शिल्लक जमा झाली असती.बिप्लव देव अलीकडेच ऐश्वर्या राय व डायना हेडनची तुलना करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते.७५ हजार रुपयांच्या कर्जातून सुरू केलेल्या व्यवसायातून युवक दर महिना २५ हजारांचे उत्पन्न मिळवू शकतो. पदवीधर झाल्यानंतर शेती, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करणे युवक कमीपणाचे समजतात. अशा विचारांमुळेच गेल्या २५ वर्षांत त्रिपुरातील युवक फारशी प्रगती करू शकले नाहीत.पदवीधर युवकांनी गोपालनाचा व्यवसाय सुरू करावा, असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात गायी पाळल्या गेल्या पाहिजेत. गायीच्या दुधाला दर लीटरला ५० रुपये भाव मिळतो. गेल्या दहा वर्षांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधराने याच कालावधीत गोपालनाचा व्यवसाय केला असता, तर एव्हाना त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपयांची शिल्लक जमा झाली असती.