शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन, पानटपरी सुरू करावी; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:09 IST

सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.

आगरतळा : सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन करावे किंवा पानटपरी सुरु करावी, अशी मुक्ताफळे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी उधळली आहेत. भाजपा नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवरून वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावलेला असतानाच बिप्लव देव यांनी त्यांना आणखी एका विधानाची भर टाकली आहे. त्रिपुरातील एका चर्चासत्राचे उद्घाटन करताना बिप्लव देव पुढे म्हणाले की, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी युवक अनेक वर्षे राजकारण्यांच्या मागे धावत असतात. त्यामुळे या युवकांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात. त्याऐवजी त्यांनी पानटपरीचा धंदा केला असता तर एव्हाना त्या प्रत्येक युवकाच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपर्यंत शिल्लक जमा झाली असती.बिप्लव देव अलीकडेच ऐश्वर्या राय व डायना हेडनची तुलना करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते.७५ हजार रुपयांच्या कर्जातून सुरू केलेल्या व्यवसायातून युवक दर महिना २५ हजारांचे उत्पन्न मिळवू शकतो. पदवीधर झाल्यानंतर शेती, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करणे युवक कमीपणाचे समजतात. अशा विचारांमुळेच गेल्या २५ वर्षांत त्रिपुरातील युवक फारशी प्रगती करू शकले नाहीत.पदवीधर युवकांनी गोपालनाचा व्यवसाय सुरू करावा, असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात गायी पाळल्या गेल्या पाहिजेत. गायीच्या दुधाला दर लीटरला ५० रुपये भाव मिळतो. गेल्या दहा वर्षांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधराने याच कालावधीत गोपालनाचा व्यवसाय केला असता, तर एव्हाना त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपयांची शिल्लक जमा झाली असती.