शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन, पानटपरी सुरू करावी; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:09 IST

सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.

आगरतळा : सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन करावे किंवा पानटपरी सुरु करावी, अशी मुक्ताफळे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी उधळली आहेत. भाजपा नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवरून वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावलेला असतानाच बिप्लव देव यांनी त्यांना आणखी एका विधानाची भर टाकली आहे. त्रिपुरातील एका चर्चासत्राचे उद्घाटन करताना बिप्लव देव पुढे म्हणाले की, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी युवक अनेक वर्षे राजकारण्यांच्या मागे धावत असतात. त्यामुळे या युवकांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात. त्याऐवजी त्यांनी पानटपरीचा धंदा केला असता तर एव्हाना त्या प्रत्येक युवकाच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपर्यंत शिल्लक जमा झाली असती.बिप्लव देव अलीकडेच ऐश्वर्या राय व डायना हेडनची तुलना करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते.७५ हजार रुपयांच्या कर्जातून सुरू केलेल्या व्यवसायातून युवक दर महिना २५ हजारांचे उत्पन्न मिळवू शकतो. पदवीधर झाल्यानंतर शेती, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करणे युवक कमीपणाचे समजतात. अशा विचारांमुळेच गेल्या २५ वर्षांत त्रिपुरातील युवक फारशी प्रगती करू शकले नाहीत.पदवीधर युवकांनी गोपालनाचा व्यवसाय सुरू करावा, असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात गायी पाळल्या गेल्या पाहिजेत. गायीच्या दुधाला दर लीटरला ५० रुपये भाव मिळतो. गेल्या दहा वर्षांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधराने याच कालावधीत गोपालनाचा व्यवसाय केला असता, तर एव्हाना त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपयांची शिल्लक जमा झाली असती.