शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या समस्येवर ‘इन्सानियत’चा तोडगा!

By admin | Updated: August 10, 2016 04:59 IST

हिंसाचाराने धगधगत असलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर तब्बल महिनाभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित

भाबरा (मध्य प्रदेश) : हिंसाचाराने धगधगत असलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर तब्बल महिनाभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इन्सानियत, जम्हुरियत आणि काश्मिरियत (मानवता, लोकशाही आणि काश्मीर) ही भावना जपत लोकशाही आणि वाटाघाटीचा मार्ग अनुसरण्याचे आवाहन केले. शांतता, एकता आणि सद्भावना जपत सर्व मिळून काश्मीरला धरतीवरील नंदनवनच ठेवू या, अशी सादही त्यांनी काश्मिरी तरुणांना घातली. तमाम भारतीय अनुभवत असलेले स्वातंत्र्य काश्मीरलाही आहे. निरपराध तरुणांच्या हाती लॅपटॉप, पुस्तके आणि क्रिकेटच्या बॅटऐवजी दगडधोंडे पाहून दु:ख होते, असे सांगत त्यांनी तरुणांना धरतीवरील या नंदनवनात शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले.स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी (भाबरा) ‘स्वातंत्र्यांची ‘७० साल आझादी... जरा याद करो कुर्बानी..’ या देशभक्ती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित जाहीर सभेत त्यांनी काश्मीरमधील स्थितीचा उल्लेख करीत काश्मिरी जनतेला शांतता हवी आहे. तरुणांच्या हाती दगडधोंडे नव्हेंतर लॅपटॉप, पुस्तके असावीत. आम्हाला काश्मीरचा विकास हवा आहे. जम्मू-काश्मिरमधील प्रत्येकाचे भविष्य तमाम भारतीयांप्रमाणे उज्वल व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे स्पष्ट करीत काश्मिरला हवी ती मदत देण्याची केंद्राची तयारी असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.आज आॅगस्ट क्रांती दिन आहे. महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’चा नारा देत इंग्रजांना गाशा गुंडाळण्याचा इशारा दिला होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण करणारे हुत्मामे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्व भारतीयांनी आज निर्धार करावा. त्यांनी भारतासाठी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी तसेच वंचित, पीडित, शोषितांचे जीवनमान सुखदायी करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे.पंतप्रधान गुजरातीतही बोलले...गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्हा आहे. याच जिल्ह्यातील भाबरा गावी आदिवासी समुदायापुढे बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात गुजराती भाषेतून करताच टाळ्यांचा वर्षाव झाला. या पवित्र भूमीत येऊन मी धन्य झालो. ही वीरांची भूमी आहे. येथील संस्कृतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. संत सिंगाजी यांचा आर्शिवाद या भूमीला लाभला आहे. स्वांतत्र्यांच्या लढ्यात येथील भूमीपूत्रांनीही मोठे योगदान दिले आहे, असे मोदी गुजराती भाषेतून बोलले.द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव असताना भारताने पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून सीमापार दहशतवादाला पाककडून दिले जाणारे प्रोत्साहन व काश्मीरमधील असंतोषाला पाककडून सातत्याने दिली जाणारी चिथावणी याबद्दल त्यांना कडक शब्दांत समज दिली.आतापर्यंत दोन पोलिसांसह ५५ ठार८ जुलै रोजी हिज्बुल मुजाहिदीनचा बुऱ्हाण वनी सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाल्यानंतर जम्मू-काश्मीर धुमसत आहे. आतापर्यंत घडलेल्या हिंसक घटनांत दोन पोलिसांसह ५५ जण ठार झाले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन काश्मीरमधील स्थितीवर चर्चा केली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री राजनाथ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.स्वातंत्र्य सेनानींनी जे स्वातंत्र्य हिंदुस्थानला दिले, तेच स्वातंत्र्य काश्मीरलाही मिळाले आहे. परंतु, काही मूठभर लोक काश्मीरच्या महान परंपेरला तडा देत आहेत. मानवता आणि काश्मिरी परंपरा न डागाळता धरतीवरील हे नंदनवन जपू या! देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनो पुढे या. विकासाच्या मार्गाने समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो, असे सांगत त्यांनी काश्मीरच्या विकासासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले.देशभक्तीच्या भावनेतून काम करा- शिवराज सिंह क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावाला भेट देणारे मोदी हे भारताचे पंतप्रधान होय. ...जरा याद कुर्बानी...या देशभक्तीपर जागृती अभियानातहत ९ ते २३ आॅगस्टपर्यंत देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आणार आहेत. केंद्र सरकारचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. भारतीय स्वातंत्र्यांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्यां वीरांचे स्मरण करत त्यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी तसेच स्वच्छता आणि डिजिटल इंडिया या योजना सफल करण्यासाठी युवकांनी पुढे येत देशभक्तीच्या भावनेतून झटले पाहिजे, असे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी केले.