शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

ममतांच्या राजवटीत पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत; नरेंद्र मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 07:03 IST

सिंडिकेट राज केले स्थापन

चुचुरा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पैसै चारल्याशिवाय सामान्य माणसांचे एकही काम होत नाही. या सरकारने बंगालच्या प्रत्येक क्षेत्रात सिंडिकेट राज स्थापन केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी सरकार आपली व्होटबँक शाबूत राखण्यासाठी अनुनयाचे राजकारण करत आहे. त्यापायी पश्चिम बंगालमधील सांस्कृतिक परंपरा, आदर्श व्यक्ती यांच्याकडे हे सरकार डोळेझाक करत आहे. 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुषमान भारतसारख्या योजनांच्या लाभापासून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे शेतकरी, गरीब व्यक्तींना वंचित ठेवले. स्वातंत्र्यसेनानी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ज्या घरात वंदेमातरम्‌ हे गीत लिहिले, ते घर मोडकळीस आले आहे. बंगाली अस्मितेच्या प्रतिकांकडे ममता बॅनर्जी यांनी कसे दुर्लक्ष केले, याचे हे ढळढळीत उदाहरण आहे.

तागाच्या उद्योगाचे आता कंबरडे मोडले 

मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या औद्योगिक विकासाकडे ममता बॅनर्जी यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. या राज्यात पूर्वीच्या काळी भरभराटीला असलेल्या तागाच्या उद्योगाचे आता कंबरडे मोडले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन घडवायचे, असा निर्धार पश्चिम बंगालच्या जनतेने केला आहे. भाजप या राज्याला कुणाचा अनुनय करणारे नव्हे, तर विकासाला प्राधान्य देणारे सरकार देईल. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल