शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका: खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 16:58 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने देशांतर्गत बाजारातही खाद्यतेल महाग झाले आहे.

मुंबई - सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही खाद्यतेलाच्या किमतीत वाढ सुरूच आहे. खाद्यतेलाचे भाव सण संपल्यानंतर कमी होतात. मात्र, यावेळी कच्च्या तेलाच्या दरवाढीचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले भाव आहे. याचं कारण रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव असल्याचं बोललं जात आहे. व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार खाद्यतेलाचे दरही जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. मात्र, सणासुदीचा हंगाम नुकताच संपला तेव्हा मागणी वाढली होती. 

त्याचबरोबर आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने हीच मागणी कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती वाढणे साहजिक आहे. पण बाजारात भरपूर तेल उपलब्ध आहे. गेल्या महिनाभरात देशात खाद्यतेलाच्या किमती १५ ते ३० रुपयांनी वाढल्या आहेत. महिन्याभरात रिफाइंड सोयाबीन तेलाचा घाऊक भाव १२०-१२५ रुपयांवरून १४०-१४५ रुपये, मोहरीचे तेल १३०-१३५ रुपयांवरून १४५-१५० रुपये, सूर्यफूल तेल १३०-१३५ रुपयांवरून १६०-१६५ रुपये लिटर झाले. या दरम्यान आयात केलेल्या पामोलिन तेलाचे दर ९० ते ९५ रुपयांवरून १०५ ते ११० रुपये प्रति लिटर झालेत. 

सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑइल इंडस्ट्री अँड ट्रेडशी संबंधित व्यापाऱ्यांनी सांगितले की, रशिया-युक्रेनमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारतातील खाद्यतेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारावर बरीच अवलंबून असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेजीमुळे देशात खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. एका महिन्यात खाद्यतेलाच्या दरात १५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

तर सणासुदीच्या काळात मागणीमुळे दिवाळीनंतर खाद्यतेल स्वस्त होण्याची अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने देशांतर्गत बाजारातही खाद्यतेल महाग झाले आहे. रशिया-युक्रेनमधील तणाव वाढल्याने सूर्यफूल तेलात सर्वाधिक २५ टक्के वाढ झाली आहे. युक्रेनमधून सूर्यफूल तेल भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते असं फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्सशी संबंधित लोकांनी सांगितले

खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतील, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जर रशिया-युक्रेन आणि इतर देशांदरम्यान तणावाची परिस्थिती असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती थोडी शांत झाली आहे. हीच परिस्थिती पुढे चालू राहिल्यास अपट्रेंड थांबू शकतो आणि उतरती कळा देखील शक्य आहे. तणाव वाढल्याने किंमती वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारावर पूर्णपणे नियंत्रणात असतात. तिथे किंमत पडल्यावर कमी होईल आणि वाढल्यावर वाढेल असं ठक्कर सांगतात. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"