शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका: खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 16:58 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने देशांतर्गत बाजारातही खाद्यतेल महाग झाले आहे.

मुंबई - सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही खाद्यतेलाच्या किमतीत वाढ सुरूच आहे. खाद्यतेलाचे भाव सण संपल्यानंतर कमी होतात. मात्र, यावेळी कच्च्या तेलाच्या दरवाढीचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले भाव आहे. याचं कारण रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव असल्याचं बोललं जात आहे. व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार खाद्यतेलाचे दरही जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. मात्र, सणासुदीचा हंगाम नुकताच संपला तेव्हा मागणी वाढली होती. 

त्याचबरोबर आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने हीच मागणी कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती वाढणे साहजिक आहे. पण बाजारात भरपूर तेल उपलब्ध आहे. गेल्या महिनाभरात देशात खाद्यतेलाच्या किमती १५ ते ३० रुपयांनी वाढल्या आहेत. महिन्याभरात रिफाइंड सोयाबीन तेलाचा घाऊक भाव १२०-१२५ रुपयांवरून १४०-१४५ रुपये, मोहरीचे तेल १३०-१३५ रुपयांवरून १४५-१५० रुपये, सूर्यफूल तेल १३०-१३५ रुपयांवरून १६०-१६५ रुपये लिटर झाले. या दरम्यान आयात केलेल्या पामोलिन तेलाचे दर ९० ते ९५ रुपयांवरून १०५ ते ११० रुपये प्रति लिटर झालेत. 

सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑइल इंडस्ट्री अँड ट्रेडशी संबंधित व्यापाऱ्यांनी सांगितले की, रशिया-युक्रेनमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारतातील खाद्यतेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारावर बरीच अवलंबून असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेजीमुळे देशात खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. एका महिन्यात खाद्यतेलाच्या दरात १५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

तर सणासुदीच्या काळात मागणीमुळे दिवाळीनंतर खाद्यतेल स्वस्त होण्याची अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने देशांतर्गत बाजारातही खाद्यतेल महाग झाले आहे. रशिया-युक्रेनमधील तणाव वाढल्याने सूर्यफूल तेलात सर्वाधिक २५ टक्के वाढ झाली आहे. युक्रेनमधून सूर्यफूल तेल भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते असं फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्सशी संबंधित लोकांनी सांगितले

खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतील, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जर रशिया-युक्रेन आणि इतर देशांदरम्यान तणावाची परिस्थिती असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती थोडी शांत झाली आहे. हीच परिस्थिती पुढे चालू राहिल्यास अपट्रेंड थांबू शकतो आणि उतरती कळा देखील शक्य आहे. तणाव वाढल्याने किंमती वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारावर पूर्णपणे नियंत्रणात असतात. तिथे किंमत पडल्यावर कमी होईल आणि वाढल्यावर वाढेल असं ठक्कर सांगतात. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"