शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

स्थलांतरित परतलेल्या राज्यांपैकी सहा राज्यांत संसर्ग वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 06:09 IST

रुग्णसंख्येत झाली वाढ : उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसामचा समावेश

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात काम करीत असलेले कामगार आपापल्या राज्यात परतल्यानंतर, यापैकी ६ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे समोर आले आहे. १५ दिवसांतील रुग्णसंख्येचा अभ्यास केल्यानंतर, मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार परतलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाम या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.या ६ राज्यांमध्ये १ मेपासून रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण ८.२ पटीने जास्त आहे. उर्वरित राज्यांमध्ये हे प्रमाण ७ पट इतके आहे. स्थलांतरित कामगार आपल्या मूळगावी परतल्यानंतरच या ६ राज्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढला.

गत ३ आठवड्यांपासून ६ राज्यांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत गेल्याचे दिसते. यापैकी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि झारखंड या ४ राज्यांत नवे रुग्ण आढळण्याचे साप्ताहिक प्रमाण आजवर सर्वाधिक आहे. या तुलनेत बिहार आणि ओडिशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रमाण थोडे कमी आहे, असे आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)च्८ जून या दिवशीची रुग्णसंख्या लक्षात घेता, देशातील एकूण रुग्णांपैकी १२ टक्के रुग्ण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील आहेत. १ मे रोजी हे प्रमाण १०.५ टक्के होते.च्याशिवाय १ ते ७ मे या काळात देशात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी८ टक्के रुग्ण या ६ राज्यांतून होते. २ ते ८ जून या आठवड्यात हे प्रमाण दुप्पट म्हणजे १६ टक्के इतके झाले आहे.टेस्टच्या प्रमाणात वाढच्६ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्यामागे टेस्टची वाढलेली संख्या कारणीभूत असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र, याच काळात संपूर्ण देशभर टेस्ट आणि रुग्णांची संख्या वाढल्याने हा मुद्दा गैरलागू ठरतो. 

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार