शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:24 IST

पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.

ठळक मुद्दे  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.  ही काळाची गरज असल्याचेही उद्योगजगतानं सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल. तसेच लॉकडाऊन घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणं शक्य होणार आहे. आर्थिक प्रगतीला नवीन गती मिळणार आहे, असं मत उद्योग मंडळानं व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.त्यानंतर आनंद महिंद्रा यांनीसुद्धा ट्विट करत पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, 'पंतप्रधानांचे कार्पे डायम (दिवस जप्त करणारं) भाषण होतं, संधीच्या रुपातून जगण्याच्या प्रयत्नांचा दृष्टिकोन बदलेल अन् त्याला सामर्थ्याचं रूप प्राप्त होईल. हा बदल 1991च्या धर्तीवर होईल की नाही याची आम्हाला उद्या (बुधवारी) खात्री पटेल. पण आज रात्री मला नीट झोप येणार नाही, असे मला वाटते.  'भारत विकासाच्या मार्गावर येईल'शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेमुळे स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. उद्योग चेंबर सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले, "पंतप्रधान जमीन, कामगार, रोख आणि कायदा सुलभ करण्याच्या विषयावर बोलले, आम्ही त्यांचे कौतुक करतो." हे अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. या चार क्षेत्रातील सुधारणांमुळे संकटांच्या या घडीत आर्थिक विकासाला नवीन गती मिळेल. ”फिक्की अध्यक्ष संगीता रेड्डी म्हणाल्या की, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यवस्था, लोकसंख्या आणि मागणी वाढल्यास भारत पुन्हा प्रगतिपथावर  येईल. असोचेम आणि नरेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले की, हे पॅकेज अर्थव्यवस्थेला गती देईल. हे खरोखर कौतुकास्पद पॅकेज आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आम्ही वाट पाहत होतो." पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डीके अग्रवाल म्हणाले की, प्रोत्साहन पॅकेज ही काळाची गरज आहे. हे पॅकेज अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करेल आणि आर्थिक हालचालींना वेग देईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या