शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:24 IST

पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.

ठळक मुद्दे  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.  ही काळाची गरज असल्याचेही उद्योगजगतानं सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल. तसेच लॉकडाऊन घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणं शक्य होणार आहे. आर्थिक प्रगतीला नवीन गती मिळणार आहे, असं मत उद्योग मंडळानं व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.त्यानंतर आनंद महिंद्रा यांनीसुद्धा ट्विट करत पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, 'पंतप्रधानांचे कार्पे डायम (दिवस जप्त करणारं) भाषण होतं, संधीच्या रुपातून जगण्याच्या प्रयत्नांचा दृष्टिकोन बदलेल अन् त्याला सामर्थ्याचं रूप प्राप्त होईल. हा बदल 1991च्या धर्तीवर होईल की नाही याची आम्हाला उद्या (बुधवारी) खात्री पटेल. पण आज रात्री मला नीट झोप येणार नाही, असे मला वाटते.  'भारत विकासाच्या मार्गावर येईल'शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेमुळे स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. उद्योग चेंबर सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले, "पंतप्रधान जमीन, कामगार, रोख आणि कायदा सुलभ करण्याच्या विषयावर बोलले, आम्ही त्यांचे कौतुक करतो." हे अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. या चार क्षेत्रातील सुधारणांमुळे संकटांच्या या घडीत आर्थिक विकासाला नवीन गती मिळेल. ”फिक्की अध्यक्ष संगीता रेड्डी म्हणाल्या की, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यवस्था, लोकसंख्या आणि मागणी वाढल्यास भारत पुन्हा प्रगतिपथावर  येईल. असोचेम आणि नरेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले की, हे पॅकेज अर्थव्यवस्थेला गती देईल. हे खरोखर कौतुकास्पद पॅकेज आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आम्ही वाट पाहत होतो." पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डीके अग्रवाल म्हणाले की, प्रोत्साहन पॅकेज ही काळाची गरज आहे. हे पॅकेज अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करेल आणि आर्थिक हालचालींना वेग देईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या