शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : बापरे! सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद पण सानुग्रह अनुदानासाठी आले 10 हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 20:29 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8,954 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये कोरोना मृतांच्या आकड्य़ाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे पण सानुग्रह अनुदानासाठी तब्बल 10 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. 

इंदूर शहरातील सरकारी रेकॉर्डमध्ये कोरोना महामारीमुळे 1339 मृत्यूची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत. यामध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीबाबत विविध योजना आणि सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. हे अर्ज प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, मुख्यमंत्री कोविड योद्धा योजना, तसेच भारत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या 50 हजार रुपयांच्या सानुग्रह रकमेशी संबंधित आहेत. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना या योजनांतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

इंदूरमध्ये 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान 

महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि मदत आयुक्त मनीष रस्तोगी यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये इंदूर जिल्ह्यात 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. या योजनेसाठी दररोज शेकडो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी तीन हजारांहून अधिक अर्ज आले होते. मात्र, त्यातील किती बरोबर आणि किती अयोग्य हे तपासानंतरच कळेल. या अर्जांची छाननी करणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.

एकाच कुटुंबातून दोन अर्ज येण्याची शंका

मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता एकाच कुटुंबाकडून मदतीच्या रकमेसाठी दोन अर्जही आले असावेत, अशी शंका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापैकी काही अर्ज असेही असू शकतात की, वडिलांच्या मृत्यूनंतर दोन किंवा तीन मुलांनी वारस म्हणून अर्ज केले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनीही सानुग्रह अनुदानासाठी दावा केला असावा. आता तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश