शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

CoronaVirus News : बापरे! सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद पण सानुग्रह अनुदानासाठी आले 10 हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 20:29 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8,954 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये कोरोना मृतांच्या आकड्य़ाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे पण सानुग्रह अनुदानासाठी तब्बल 10 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. 

इंदूर शहरातील सरकारी रेकॉर्डमध्ये कोरोना महामारीमुळे 1339 मृत्यूची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत. यामध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीबाबत विविध योजना आणि सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. हे अर्ज प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, मुख्यमंत्री कोविड योद्धा योजना, तसेच भारत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या 50 हजार रुपयांच्या सानुग्रह रकमेशी संबंधित आहेत. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना या योजनांतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

इंदूरमध्ये 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान 

महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि मदत आयुक्त मनीष रस्तोगी यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये इंदूर जिल्ह्यात 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. या योजनेसाठी दररोज शेकडो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी तीन हजारांहून अधिक अर्ज आले होते. मात्र, त्यातील किती बरोबर आणि किती अयोग्य हे तपासानंतरच कळेल. या अर्जांची छाननी करणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.

एकाच कुटुंबातून दोन अर्ज येण्याची शंका

मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता एकाच कुटुंबाकडून मदतीच्या रकमेसाठी दोन अर्जही आले असावेत, अशी शंका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापैकी काही अर्ज असेही असू शकतात की, वडिलांच्या मृत्यूनंतर दोन किंवा तीन मुलांनी वारस म्हणून अर्ज केले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनीही सानुग्रह अनुदानासाठी दावा केला असावा. आता तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश