शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

CoronaVirus News : बापरे! सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद पण सानुग्रह अनुदानासाठी आले 10 हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 20:29 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8,954 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये कोरोना मृतांच्या आकड्य़ाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे पण सानुग्रह अनुदानासाठी तब्बल 10 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. 

इंदूर शहरातील सरकारी रेकॉर्डमध्ये कोरोना महामारीमुळे 1339 मृत्यूची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत. यामध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीबाबत विविध योजना आणि सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. हे अर्ज प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, मुख्यमंत्री कोविड योद्धा योजना, तसेच भारत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या 50 हजार रुपयांच्या सानुग्रह रकमेशी संबंधित आहेत. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना या योजनांतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

इंदूरमध्ये 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान 

महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि मदत आयुक्त मनीष रस्तोगी यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये इंदूर जिल्ह्यात 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. या योजनेसाठी दररोज शेकडो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी तीन हजारांहून अधिक अर्ज आले होते. मात्र, त्यातील किती बरोबर आणि किती अयोग्य हे तपासानंतरच कळेल. या अर्जांची छाननी करणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.

एकाच कुटुंबातून दोन अर्ज येण्याची शंका

मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता एकाच कुटुंबाकडून मदतीच्या रकमेसाठी दोन अर्जही आले असावेत, अशी शंका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापैकी काही अर्ज असेही असू शकतात की, वडिलांच्या मृत्यूनंतर दोन किंवा तीन मुलांनी वारस म्हणून अर्ज केले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनीही सानुग्रह अनुदानासाठी दावा केला असावा. आता तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश