शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

भारत-पाक नेहमीच शत्रू म्हणून राहू शकत नाही - पाक NSA

By admin | Updated: April 13, 2017 09:44 IST

कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या इशा-यानंतर पाकिस्तान बिथरलेला दिसतो आहे. कारण

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या इशा-यानंतर पाकिस्तान बिथरलेला दिसतो आहे. कारण, भारत आणि पाकिस्तान नेहमी एकमेकांचे शत्रू बनून राहू शकत नाहीत आणि दोन्ही शेजारी देशांनी संवाद साधण्यासहीत वादांवर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असे मत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जंजुआ यांनी मांडले आहे.
 
पाकिस्ताननं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवरच जंजुआ यांनी हे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे, भारत द्विपक्षीय संबंधांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी नकार देत असल्याचा आरोपही जंजुआ यांनी केला आहे. दरम्यान, जाधव यांनी फाशी शिक्षा झाल्यास याचे द्विपक्षीय संबंधांवर वाईट परिणाम होतील, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. 
 
कॅनडातील उच्चायुक्त पेरी सेल्डवुड यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या संवादादरम्यान जंजुआ यांना सांगितले की, "भारत काश्मीरला एक द्विपक्षीय समस्या समजत आहे आणि दुसरीकडे याच नियमांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चाही करत नाही", असा कांगावा त्यांनी केला. 
 
काश्मीरमधील परिस्थितीचा यावेळी उल्लेख करत ते असेही म्हणाले की, "कट्टरपंथीयांचे विचार केवळ शक्तीचा वापर करुन बदलले जाऊ शकत नाहीत, तर त्यासाठी त्यांचे हृदय जिंकावे लागेल. यासाठी दोन्ही देशांना संवाद साधायला हवा".
मात्र, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर पाऊलं उचलत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. 
 
पाकिस्तानातील सरकारी असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी)नं जंजुआ यांच्या वक्तव्याचा हवाला देत सांगितले की, दोन्ही देशांना संवाद आणि वादावर उपाय शोधून काढणे गरजेचं आहे.  भारत-पाकिस्तान नेहमीच एकमेकांचे शत्रूराष्ट्र बनून राहू शकत नाहीत. शिवाय यावेळी एनएसजी गटात पाकिस्तानच्या सदस्यत्वाचा विचारासाठी भेदभाव न करण्याचा आग्रहही त्यांनी केला.