शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

भारत-पाक नेहमीच शत्रू म्हणून राहू शकत नाही - पाक NSA

By admin | Updated: April 13, 2017 09:44 IST

कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या इशा-यानंतर पाकिस्तान बिथरलेला दिसतो आहे. कारण

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या इशा-यानंतर पाकिस्तान बिथरलेला दिसतो आहे. कारण, भारत आणि पाकिस्तान नेहमी एकमेकांचे शत्रू बनून राहू शकत नाहीत आणि दोन्ही शेजारी देशांनी संवाद साधण्यासहीत वादांवर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असे मत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जंजुआ यांनी मांडले आहे.
 
पाकिस्ताननं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवरच जंजुआ यांनी हे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे, भारत द्विपक्षीय संबंधांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी नकार देत असल्याचा आरोपही जंजुआ यांनी केला आहे. दरम्यान, जाधव यांनी फाशी शिक्षा झाल्यास याचे द्विपक्षीय संबंधांवर वाईट परिणाम होतील, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. 
 
कॅनडातील उच्चायुक्त पेरी सेल्डवुड यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या संवादादरम्यान जंजुआ यांना सांगितले की, "भारत काश्मीरला एक द्विपक्षीय समस्या समजत आहे आणि दुसरीकडे याच नियमांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चाही करत नाही", असा कांगावा त्यांनी केला. 
 
काश्मीरमधील परिस्थितीचा यावेळी उल्लेख करत ते असेही म्हणाले की, "कट्टरपंथीयांचे विचार केवळ शक्तीचा वापर करुन बदलले जाऊ शकत नाहीत, तर त्यासाठी त्यांचे हृदय जिंकावे लागेल. यासाठी दोन्ही देशांना संवाद साधायला हवा".
मात्र, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर पाऊलं उचलत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. 
 
पाकिस्तानातील सरकारी असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी)नं जंजुआ यांच्या वक्तव्याचा हवाला देत सांगितले की, दोन्ही देशांना संवाद आणि वादावर उपाय शोधून काढणे गरजेचं आहे.  भारत-पाकिस्तान नेहमीच एकमेकांचे शत्रूराष्ट्र बनून राहू शकत नाहीत. शिवाय यावेळी एनएसजी गटात पाकिस्तानच्या सदस्यत्वाचा विचारासाठी भेदभाव न करण्याचा आग्रहही त्यांनी केला.