शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

‘इंडिया’चे महाशक्तिप्रदर्शन! लाखो लोकांची गर्दी; खरगे, लालू, अखिलेश यांच्यासह अनेक नेते सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 07:30 IST

केंद्रातील सरकार समाजातील वंचित घटकांच्या ७३ टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, तर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘पलटूराम’ संबोधत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. 

एस. पी. सिन्हा -

पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार रालोआत सामील झाल्यानंतर राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर महाआघाडीने रविवारी जनविश्वास महामेळाव्याद्वारे महाशक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याला संबोधित करताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. केंद्रातील सरकार समाजातील वंचित घटकांच्या ७३ टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, तर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘पलटूराम’ संबोधत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. 

काँग्रेस अध्यक्षांनी देशात महागाई शिगेला पोहोचल्याचे सांगत केंद्र सरकारची हीच हमी आहे का, असा सवाल केला. महामेळाव्यात काँग्रेसचे अध्यक्ष खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव, माकप नेते सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, भाकपा-मालेचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, आदी नेत्यांनी सहभाग घेतला.

महागाई शिगेला तरीही... सतत पारडे बदलण्याच्या सवयीमुळे नितीशकुमारांवर ‘रिल्स’ बनत असून, ते पाहून त्यांना काही वाटत नाही का? देशात महागाई शिगेला पोहोचली आहे, पण तरीही ‘आमची हमी’ म्हणत ते सर्वांना फसवत आहेत, असे खरगे म्हणाले.

बदलाची सुुरुवात बिहारमधून होतेदेशात आम्ही इंडिया आघाडीचे सरकार बनवू. जेव्हा-जेव्हा देशात बदलाचे वादळ येते, तेव्हा-तेव्हा त्याची सुरुवात बिहारमधून होते. बिहार हा बदलाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. एका बाजूला द्वेष, हिंसा, अहंकार आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रेम आहे. भारतीयांच्या मनात द्वेष नाही, प्रेम आहे. मग देशात द्वेष का पसरत आहे, असा प्रश्न पडतो, असे राहुल गांधी बोलताना म्हणाले.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहारlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक