शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला, आवाजी मतदानाने झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:21 IST

पहिलाच दिवस गाजला ‘आणीबाणी’च्या उल्लेखाने.

संजय शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बलराम जाखड यांच्यानंतर ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांची ‘इंडिया आघाडी’चे के. सुरेश यांच्याशी लढत होती; मात्र आवाजी मतदानाने निर्णय बिर्ला यांच्या बाजूने लागला. संख्याबळाचा अभाव पाहता काँग्रेस आणि इंडिया आघाडीने मतदानाची मागणीही केली नाही. कालपर्यंत या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आग्रही होती. त्यासाठी तयारीही केली. कारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सर्वांत मोठी पहिली लढत होणार होती. पण, इंडिया आघाडीकडे संख्याबळ नसल्याचे दिसताच निवडणूक टळली. बिर्ला अध्यक्ष होताच त्यांनी आपल्या भाषणात आणिबाणीचा उल्लेख केला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला.

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांना सन्मानाने त्यांच्या आसनावर विराजमान केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचे हस्तांदोलन चर्चेचा विषय ठरले.

तृणमूल राहिली दूर ओम बिर्ला यांच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडीने के. सुरेश यांना उमेदवारी दिली होती; परंतु तृणमूल काँग्रेसने आधीच मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, इंडिया आघाडी व काँग्रेस नेत्यांनी उमेदवार उभे करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चाही केली नाही.

‘इंडिया आघाडी’चे संख्याबळ १९७इंडिया आघाडीच्या ७ खासदारांनी खासदार म्हणून शपथही घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानात भाग घेता आला नसता. इंडिया आघाडीच्या खासदारांची एकूण संख्या २३३ आहे, त्यापैकी २९ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या १९७ राहिली.

‘एनडीए’चे संख्याबळ ३०७ जगन मोहन रेड्डी यांच्या चार खासदारांच्या पाठिंब्याने आणि १० अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याने सत्ताधारी पक्षाच्या ‘एनडीए’च्या खासदारांची संख्या २९३ होती, तर ओम बिर्ला यांच्या बाजूने असलेली संख्या ३०७ होती. जर इंडिया आघाडीने मतदानाची मागणी केली असती तर निकाल ३०७ विरुद्ध १९७ असा लागला असता.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी