शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अवकाशानंतर समुद्राच्या खोलाशी जाण्याची भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 10:23 IST

अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी  सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत.

ठळक मुद्दे  अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी  सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत. . माणसांना अवकाशात घेऊन जाणार GSLV-Mk3 हे यान लॉन्च केल्यानंतर भारत आता माणसांना खोल समुद्रात घेऊन जाण्यास सज्ज होतो आहे. ईएसएसओ-नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीशी जोडलेल्या शास्त्रज्ञांची एक टीम समुद्रातील खोल पाण्यात जाण्याचं एक वाहन तयार करते आहे

चेन्नई, दि.5-  अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी  सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत. माणसांना अवकाशात घेऊन जाणार GSLV-Mk3 हे यान लॉन्च करण्याची तयारी सुरू असताना भारत आता माणसांना खोल समुद्रात घेऊन जाण्यास सज्ज होतो आहे.  द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

ईएसएसओ-नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीशी जोडलेल्या शास्त्रज्ञांची एक टीम समुद्रातील खोल पाण्यात जाण्याचं एक वाहन तयार करते आहे. या वाहनाचं प्राथमिक डिझाइन तयार असून या वाहनामधून तीन जण समुद्रात खोलपर्यंत जाऊ शकतात. हे वाहन पुढील पाच वर्षात तयार होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. समुद्राच्या खोल पाण्यात जाणार हे वाहन बनवायला जवळपास 500 करोडचा खर्च अपेक्षित आहे. या गाडीच्या मदतीने शास्त्रज्ञ समुद्रात सहा किलोमीटरपेक्षा जास्त खोल जाऊ शकणार आहेत. यातून खोल समुद्रात असणाऱ्या दुर्मिळ धातू आणि जीव-जंतूंबद्दल माहिती मिळविली जाणार आहे. 

समुद्रात खोलवर जाणारं हे वाहन तयार झाल्यानंतर भारताची गणना अशा ठराविक देशांमध्ये केली जाइल, ज्या देशांनी समुद्रातील खोल पाण्यात माणसांना पाठविण्याची प्रणाली विकसीत केली आहे. सध्या चीन, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जापान या देशांनी खोल समुद्रात लोकांना पाठविण्याची किमया साधली आहे. या वाहनासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून, केंद्राकडून तो मंजूर होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. केंद्राकडून मंजूरी मिळतात शास्त्रज्ञांची एक टीम या डिझाइनचं मुल्यांकन करून त्यांला अजून चांगलं बनवेल, असं एनआयओटीचे डायरेक्टर सतीश शेनोई यांनी सांगितलं आहे. या टीममध्ये इस्त्रो, डीआरडीओ आणि आयआयटीच्या तज्ज्ञांचा समावेश असेल. सध्या जे डिझाइन तयार आहे त्यानुसार,या वाहनला एका जहाजातून समुद्राच्या आता नेऊन उतरवलं जाइल. या वाहनातून आत गेलेल्या व्यक्ती पाण्याच्या आतमध्ये आठ ते दहा तास काम करू शकतील. तसंच समुद्राच्या तळासी असलेली सामुग्री गोळा करू शकणार आहेत. तसंच वाहनाला असलेल्या काचेच्या खिडकीमुळे शास्त्रज्ञांना समुद्रातील आतल्या बाजूंची योग्य माहिती मिळविणं शक्य होणार आहे. दरम्यान, हे मोठं ध्येय गाठण्याच्या आधी शास्त्रज्ञ या वाहनाशी मिळताजुळतं एक समुद्री यान पुढील तीन वर्षात बनविण्याची योजना आखत आहेत. जे वाहन लोकांना हिंद महासागरात 500 मीटरपर्यंत आत घेऊन जाऊ शकेल. शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसंच मोठ्या मोहीमेसाठी काही प्रमाणात अनुभव मिळावा, यासाठी हा छोटा प्रकल्प राबविला जाणार आहे.