शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

भारताचा पायलट पाकिस्तानमध्येच, त्याची सुखरूप सुटका करा, भारताची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 19:42 IST

आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे मायदेशी पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे.  ​​​​​​​

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमुळे खवळलेल्या पाकिस्तानने आज भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला होता. या चकमकीवेळी भारताचे एक विमान कोसळून एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. दरम्यान, आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे भारतात पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ला करण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांसमोर पाकिस्तानने आज  भारतीय हवाई हद्दीच्या केलेल्या  उल्लंधनाबाबत निषेध नोंदवण्यात आला. तसेच भारताने बालाकोट येथे केलेला एअर सर्जिकल स्ट्राइक ही असैन्यिकी आणि दहशतवाद विरोधी हल्ला होता, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटच्या सुरक्षिततेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. तसेच जखमी वैमानिकाला मारहाण करून पाकिस्तानने जिनेव्हा करारामधील मानवाधिकारासंबंधीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोपही भारताने केला. त्याबरोबरच जिनेव्हा कराराला अनुसरून पाकिस्तानने या पायलटची सुटका करावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक