शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पायलट पाकिस्तानमध्येच, त्याची सुखरूप सुटका करा, भारताची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 19:42 IST

आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे मायदेशी पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे.  ​​​​​​​

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमुळे खवळलेल्या पाकिस्तानने आज भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला होता. या चकमकीवेळी भारताचे एक विमान कोसळून एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. दरम्यान, आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे भारतात पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ला करण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांसमोर पाकिस्तानने आज  भारतीय हवाई हद्दीच्या केलेल्या  उल्लंधनाबाबत निषेध नोंदवण्यात आला. तसेच भारताने बालाकोट येथे केलेला एअर सर्जिकल स्ट्राइक ही असैन्यिकी आणि दहशतवाद विरोधी हल्ला होता, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटच्या सुरक्षिततेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. तसेच जखमी वैमानिकाला मारहाण करून पाकिस्तानने जिनेव्हा करारामधील मानवाधिकारासंबंधीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोपही भारताने केला. त्याबरोबरच जिनेव्हा कराराला अनुसरून पाकिस्तानने या पायलटची सुटका करावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक