शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारताचा पायलट पाकिस्तानमध्येच, त्याची सुखरूप सुटका करा, भारताची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 19:42 IST

आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे मायदेशी पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे.  ​​​​​​​

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमुळे खवळलेल्या पाकिस्तानने आज भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला होता. या चकमकीवेळी भारताचे एक विमान कोसळून एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. दरम्यान, आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे भारतात पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ला करण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांसमोर पाकिस्तानने आज  भारतीय हवाई हद्दीच्या केलेल्या  उल्लंधनाबाबत निषेध नोंदवण्यात आला. तसेच भारताने बालाकोट येथे केलेला एअर सर्जिकल स्ट्राइक ही असैन्यिकी आणि दहशतवाद विरोधी हल्ला होता, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटच्या सुरक्षिततेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. तसेच जखमी वैमानिकाला मारहाण करून पाकिस्तानने जिनेव्हा करारामधील मानवाधिकारासंबंधीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोपही भारताने केला. त्याबरोबरच जिनेव्हा कराराला अनुसरून पाकिस्तानने या पायलटची सुटका करावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक