शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

देशातले 50 टक्के श्रीमंत आहेत 'या' 5 राशींचे; बघा तुम्हाला धनलाभाचा योग आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 14:09 IST

जगभरात अनेक कोट्यधीश आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. बार्कलेज हुरुन इंडियानंही अशा श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली होती.

नवी दिल्ली- जगभरात अनेक कोट्यधीश आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. बार्कलेज हुरुन इंडियानंही अशा श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली होती. परंतु तुम्हाला माहीत आहे का, बार्कलेज हुरुन इंडियानं प्रसिद्ध केलेल्या यादीतील श्रीमंत व्यक्तींपैकी जवळपास 50 टक्के लोक विशेष पाच राशींमधून येतात.बार्कलेज हुरून इंडियानं जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीतील 50 टक्के श्रीमंत माणसे ही कर्क, कन्या, मेष, वृश्चिक आणि मकर राशीतून येतात. यातील 10.50 टक्के संपत्तीसह कर्क राशीतील लोक सर्वात वरच्या स्थानी आहेत. कर्क राशीच्या श्रीमंतांमध्ये 71,200 कोटींच्या संपत्तीसह गौतम अडानी सर्वात श्रीमंत आहेत. देशात श्रीमंतांच्या यादीत दुस-या स्थानी कन्या राशीचे लोक आहेत. कन्या राशीच्या लोकांकडे 9.70 टक्के संपत्ती आहे. त्यानंतर तिस-या स्थानी मेष राशीच्या व्यक्तींचा समावेश आहे.  त्यांच्याजवळ 9.3 टक्के संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर वृश्चिक राशीचे लोक असून, ते 9.2 टक्के संपत्तीचे मालक आहेत.तर मकर राशीतले व्यक्ती 9 टक्क्यांच्या संपत्तीसह 5 स्थानी आहेत. शापूरजी पालोनजी मिस्त्री कन्या राशीतील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, लुलू ग्रुपचे युसुफ अली आणि गोदरेजची स्मिता वी. कृष्णा या श्रीमंत व्यक्ती मेष राशीतील आहेत. मेषनंतर वृश्चिक आणि मकर राशींचा नंबर लागतो. कर्क, कन्या, मेष, वृश्चिक आणि मकरनंतर इतर राशींना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. यात अनुक्रमे सिंह, मीन, मिथुन, वृषभ, कुंभ आणि धनू या राशींचा नंबर लागतो. या राशीच्या लोकांकडे क्रमशः 8.5 टक्के, 8.4 टक्के, 8.1 टक्के, 7.3 टक्के, 6.9 टक्के, 6.6 टक्के आणि 6.4 टक्के संपत्ती आहे.बार्कलेज हुरुन इंडियाच्या यादीनुसार सिंह राशीचे असलेले विप्रोचे अजिम प्रेमजी हे श्रीमंत आहेत. तर सिंहनंतर तूळ राशीच्या सन फार्माच्या दिलीप सांघवी, कोटक बँकेचे उदय कोटक आणि मित्तल ग्रुपचे सीईओ एल. एन. मित्तल यांचा नंबर लागतो. तूळनंतर मीन आणि मिथुन राशींच्या लोकांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. सायरस पुनावाला, ब्रिटानियाचे नस्ली वाडिया आणि हिंदुजा ग्रुपचे एसपी हिंदुजा वृषभ, कुंभ आणि धनू राशीतून येतात. परंतु देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानीच आहेत.