शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भारताची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:17 IST

पी. चिदम्बरम; सरकारवर चढविला हल्ला

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था भीषण स्थितीत असून, कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी सोमवारी राज्यसभेत केली. भारतीय अर्थव्यवस्था ‘अकार्यक्षम डॉक्टरां’च्या हातात असल्याने ही अवस्था उद्भवली आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला.

चिदम्बरम म्हणाले की, बेरोजगारी आणि घसरता उपभोग अशा दुहेरी समस्येने अर्थव्यवस्थेला ग्रासले आहे. लोकांच्या हातात अधिक पैसा राहील, हे पाहण्याची गरज आहे. कनिष्ठ कर अधिकाऱ्यांना अभूतपूर्व अधिकार देऊन ‘कर दहशतवाद’ माजवू नका. नोव्हेंबर, २०१३ मध्ये मोदी यांनी आपणास दिलेला सल्लाच चिदम्बरम यांनी आता वित्तमंत्री सीतारामन यांना दिला. चिदम्बरम म्हणाले की, तो नेता म्हणाला होता की, ‘अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. अर्थव्यवस्थेसाठी वेळ द्या. क्षुद्र राजकारण करू नका.’ हा खरोखरच चांगला सल्ला आहे. वित्तमंत्र्यांना सल्ला देण्यासाठी या सल्ल्याचे वाचन करण्यासारखी चांगली गोष्ट मला करता येणे शक्य नाही.रुग्ण ‘आयसीयूबाहेर’चिदम्बरम यांनी म्हटले की, मोदी सरकारचे चार वर्षे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्था ‘आयसीयू’त आहे. मी मात्र म्हणेन की, रुग्णाला ‘आयसीयू’बाहेर ठेवण्यात आले असून, अकार्यक्षम डॉक्टर रुग्णाकडे नुसतेच पाहत बसले आहेत.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाchidambaram-pcचिदंबरम