शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भारताची ‘अंतराळशक्ती’ अधिक सामर्थ्यशाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 02:09 IST

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.

नवी दिल्ली : क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा ‘डीआरडीओ’चा एक कार्यक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आक्रमक क्षेपणास्त्र वाटेतच रोखणाची क्षमता सिद्ध करण्यात आली आहे. याच ‘इन्टरसेप्टर’ क्षमतेचा उपयोग ‘मिशन शक्ती’मध्ये केला गेला.संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आखलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या या मिशनचा मुख्य उद्देश कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमाने विकसित केलेली पूर्णपणे देशी तंत्रशास्त्रीय क्षमता प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करणे हा होता. मिशन यशस्वी झाल्याने भारत अंतराळात उपग्रहांच्या स्वरूपात असलेल्या आपल्या बहुमोल साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासही सक्षम असल्याचा इशारेवजा संदेशही यातून दिला गेला. आज उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरले गेलेल्या याच तंत्रज्ञानाने भारत शत्रूने सोडलेली क्षेपणास्त्रेही लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच रोखून नष्ट करू शकतो, हेही यामुळे अधोरेखित झाले.भारताने आतापर्यंत १०२ प्रक्षेपणे करून विविध प्रकारचे शेकडो उपग्रह अंतराळात सोडले आहेत. शिवाय ‘चांद्रयान’ व ‘मंगळयान’ या बाह्य अवकाशातील महत्त्वाकांक्षी मोहिमाही भारत हाती घेत आहे. यासाठी अंतराळ बाह्य धोक्यांपासून निर्धोक असणे व संभाव्य धोके परिणामकारकपणे परतवून लावण्याची क्षमता असणे देशाच्या सर्वंकष संरक्षण सिद्धतेचा एक अविभाज्य भाग आहे.नष्ट झालेल्या उपग्रहाचे काय होणार?अशा प्रकारे उपग्रह नष्ट केल्याने अंतराळात कचरा विखरून इतर उपग्रहांना व यानांना अडथळा येऊ नये याची काळजी घेतली गेली. याच उद्देशाने पृथ्वीपासून जवळच्या कक्षेतील उपग्रह ‘लक्ष्य’ म्हणून निवडला गेला.परिणामी, त्याचे भग्नावशेष गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे येतील व वातावरणाच्या घर्षणानेच बव्हंशी नष्ट होतील.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्ती