शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भारताची ‘अंतराळशक्ती’ अधिक सामर्थ्यशाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 02:09 IST

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.

नवी दिल्ली : क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा ‘डीआरडीओ’चा एक कार्यक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आक्रमक क्षेपणास्त्र वाटेतच रोखणाची क्षमता सिद्ध करण्यात आली आहे. याच ‘इन्टरसेप्टर’ क्षमतेचा उपयोग ‘मिशन शक्ती’मध्ये केला गेला.संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आखलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या या मिशनचा मुख्य उद्देश कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमाने विकसित केलेली पूर्णपणे देशी तंत्रशास्त्रीय क्षमता प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करणे हा होता. मिशन यशस्वी झाल्याने भारत अंतराळात उपग्रहांच्या स्वरूपात असलेल्या आपल्या बहुमोल साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासही सक्षम असल्याचा इशारेवजा संदेशही यातून दिला गेला. आज उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरले गेलेल्या याच तंत्रज्ञानाने भारत शत्रूने सोडलेली क्षेपणास्त्रेही लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच रोखून नष्ट करू शकतो, हेही यामुळे अधोरेखित झाले.भारताने आतापर्यंत १०२ प्रक्षेपणे करून विविध प्रकारचे शेकडो उपग्रह अंतराळात सोडले आहेत. शिवाय ‘चांद्रयान’ व ‘मंगळयान’ या बाह्य अवकाशातील महत्त्वाकांक्षी मोहिमाही भारत हाती घेत आहे. यासाठी अंतराळ बाह्य धोक्यांपासून निर्धोक असणे व संभाव्य धोके परिणामकारकपणे परतवून लावण्याची क्षमता असणे देशाच्या सर्वंकष संरक्षण सिद्धतेचा एक अविभाज्य भाग आहे.नष्ट झालेल्या उपग्रहाचे काय होणार?अशा प्रकारे उपग्रह नष्ट केल्याने अंतराळात कचरा विखरून इतर उपग्रहांना व यानांना अडथळा येऊ नये याची काळजी घेतली गेली. याच उद्देशाने पृथ्वीपासून जवळच्या कक्षेतील उपग्रह ‘लक्ष्य’ म्हणून निवडला गेला.परिणामी, त्याचे भग्नावशेष गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे येतील व वातावरणाच्या घर्षणानेच बव्हंशी नष्ट होतील.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्ती