शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

भारतीय सैनिक करण जोहर, महेश भट्टसारखे वागले तर चालेल का - मेजर गौरव आर्य

By admin | Updated: October 4, 2016 15:29 IST

सैनिक महेश भट्ट व करण जोहरप्रमाणे नियंत्रण रेषेपलीकडे गेले आणि पाकिस्तानी सैनिकांना शेक हँड करत बसले तर चालेल का? बाकी सगळे मजा करत असताना, मीच कशाला जीवाशी खेळू असा विचार सैनिकांनी केला तर चालेल का?

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - करण जोहर, महेश भट्ट आदींनी पाकिस्तानी कलाकारांसदर्भात घेतलेल्या भूमिकेचा मेजर गौरव आर्य यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून भारतीय सैनिकांची परिस्थिती मांडली असून करण जोहर व महेश भट्टसारखे मोजके भारतीय सैनिकांचे मनोबल कसे खच्ची करतात याचा दाखला दिला आहे. आर्य यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून ती हजारो जणांनी शेअर केली आहे.
आर्य यांनी मांडलेल्या भूमिकेतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
- करण जोहर, महेश भट्ट म्हणतात दहशतवाद थांबवा, चर्चा नाही. क्रिकेट बोर्ड पाकिस्तानबरोबर सामने खेळवणार नी काही उद्योग पाकिस्तानबरोबर व्यापार करणार. आणि हे सगळं होत असताना आपले सैनिक मात्र, सीमेवर शहीद होत राहणार.
- पाकिस्तानी कलाकारांना परत पाठवून, क्रिकेट बंद करून आणि व्यापार थांबवून दहशतवाद थांबेल का? नक्कीच थांबणार नाही, परंतु एकीचे भावनात्मक दर्शन तर घडेल. अन्यथा, सैनिक विचारात पडतील, की भारत पाक संबंधांमध्ये फक्त आम्हीच का भरडले जावं?
- भारत - पाकिस्तान वाद हा काही सैनिकांचा वैयक्तिक वाद नाहीये. हे सैनिक मरतात आणि शत्रूला मारतात, तुमच्या नी माझ्यासाठी. विचार करा, जर सैनिकांनी करण जोहर नी महेश भट्टसारखं वागायचं ठरवलं तर चालेल का? सैनिक महेश भट्ट व करण जोहरप्रमाणे नियंत्रण रेषेपलीकडे गेले आणि पाकिस्तानी सैनिकांना शेक हँड करत बसले तर चालेल का? बाकी सगळे मजा करत असताना, मीच कशाला जीवाशी खेळू असा विचार सैनिकांनी केला तर चालेल का?
- कल्पना करा, सैनिक आपल्या वरीष्ठांकडे जातील नी सांगतील, सर मी सीमेवर प्राण द्यायला जातोय, परंतु हे लोक तर सांगताहेत की दोन्ही देशांमध्ये सगळं काही सुरळित आहे म्हणून...
- देशभक्ती आणि त्याग हा काही फक्त सैनिकांनी घेतलेला मक्ता नाहीये. भारत हा जेवढा सैनिकांचा देश आहे, तेवढाच महेश भट्ट यांचाही आहे. 
- अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिकवर 1980मध्ये बहिष्कार टाकला तर रशियाने 1984 मध्ये लॉस एंजलिसमधल्या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. ज्यावेळी देशहित सर्वोच्च असतं त्यावेळी असं होतं आणि भारताच्या बाबतीतही असंच व्हायला हवं.
- पाकिस्तान 70 वर्षे भारतीयांचा बळी घेत आहे आणि हे आपल्या एवढं अंगवळणी पडलंय की आपल्याला सिनेमा बनवणं, वा क्रिक्रेट खेळत बसणं हे सैनिकांच्या बलीदानापेक्षा महत्त्वाचं वाटायला लागलंय. 
- उरीमध्ये 18 कुटुंबं उध्वस्त झाली, परंतु बॉलीवूडमधून काही ऐकायला मिळायलं नाही, मात्र, फवाद खानला जायला लागलं याचं किती दु:ख झालं. लगेच पाकिस्तानी कलाकारांसाठी ट्विट अत्यावश्यक बनलं.
- हिंदी सिनेजगतात राहत फेतह अली खानच्या पूर्वी संगीतच नव्हतं असं हे निर्माते व दिग्दर्शक तुमच्या गळी उतरवतील. भारतीय क्रिकेट बोर्ड तर  पैसे कमवायलाच बसलेलं आहे. भारत पाकिस्तान सामने अॅशेस पेक्षा चांगले असतात असं बोर्ड सांगेल. जणू काही, भारतीय सैनिक हे परग्रहावरचेच आहेत.
- नियंत्रण रेषेपासून हजारो किलोमीटर लांब राहून शांततेची मागणी करणं फार सोपं आहे कारण तुमच्यासाठी आज रात्री पार्टी कुठे करायची आणि पुढच्या सिनेमासाठी भांडवल कुठनं उभारायचं याचीच तुम्हाला चिंता आहे.
- शांतता हवी हे घोषवाक्य नाहीये ते युद्धसमाप्तीनंतरचं वास्तव आहे. दहा वर्षांची लहान मुलगी आदिती पत्र लिहिते आणि देश म्हणजे काय हे तिला कळलंय हे जाणवतं. याची तुलना महेश भट्टशी करा. माझं मत आदितीला आहे, तुमचं कुणाला हे तुम्हीच ठरवा...
जय हिंद
मेजर गैरव आर्य (निवृत्त)