शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus: मोठा निर्णय! ३१ मार्चपर्यंत रेल्वेकडून सर्व प्रवासी गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 14:17 IST

Coronavirus कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय. ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द केल्या आहेत. या काळात एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवादेखील बंद राहणार आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असेल. रेल्वे बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मालगाड्या सुरू असतील. तर मुंबईतील लोकल सेवा आज रात्रीपर्यंत सुरू असेल. यानंतर ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लोकल सेवा बंद करण्यात येईल.कोरोनाबाधित देशांमधून आलेले, क्वॉरेंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आलेले अनेक जण रेल्वेतून प्रवास करत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. याशिवाय मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहणारे लाखो परप्रांतीय कोरोनाच्या भीतीनं त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी करू लागले. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधील गर्दीदेखील वाढलीय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही वाढतेय. याच पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतलाय.मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत असल्यानं बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमधून आलेले परप्रांतीय मोठ्या संख्येनं त्यांच्या गावी जात आहेत. त्यामुळे त्या राज्यांमधील आरोग्य सेवेवर ताण पडण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बाहेरुन येणाऱ्या ट्रेनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. इतरही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून अशाच प्रकारची मागणी केली जाण्याची शक्यता होती. त्याच्या आधीच रेल्वे मंत्रालयानं सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे