शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

Indian Railway: मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वे मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 21:06 IST

Indian Railway News: सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा धडाका लावलेला आहे. एअर इंडियासारखी सरकारी विमान कंपनीही खासगी हातात देण्यात आली आहे. त्यामुळे आता मोदी सरकार रेल्वेचही खासगीकरण करणार की काय, असा प्रश्न विचारण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी मोठे विधान केले आहे. सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे वैष्णव यांनी म्हटले आहे.

लोकसभेमध्ये २०२२-२३साठी रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानांच्या मागणीवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेने हल्लीच भरतीबाबतच्या गैरसमजावर सहानुभूतीपूर्वक मार्गाने तोडगा काढला आहे. रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, रेल्वेच्या भरतींवर कुठलेही निर्बंध नसून, १.१४ लाख रिक्त पदांसाटी भरती सुरू आहे.

त्यानंतर लोकसभेने आवाजी मतदानाने रेल्वेसाठी अनुदानाच्या मागणील मान्यता दिली. चर्चेदरम्यान, अनेक खासदारांनी सरकारवर रेल्वेच्या खासगीकरणाचा आरोप केला. त्यावर रेल्वेमंत्री म्हणाले की, ही चर्चा काल्पनिक आहे. ट्रॅक रेल्वेचे आहेत. स्टेशन रेल्वेचे आहेत. इंजिन रेल्वेची आहेत. गाड्या रेल्वेच्या आहेत. सिग्नलिंग सिस्टिम रेल्वेची आहे. तिथे खासगीकरणासारखी कुठलीही बाब नाही आहे. रेल्वेच्या खासगीकरणाची कुठलीही योजना नाही आहे.

दरम्यान, फ्रेट कॉरिडॉरच्या खासगीकरणाचीही कुठलीही योजना नसल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सभागृहा सांगितले. त्यांनी सांगितले की, रेल्वे सामाजिक दायित्वांना पूर्ण करणे सुरू ठेवेल. तसेच प्रवासी भाड्यावर ६० हजार रुपयांची सब्सिडी दिली जाते.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकारrailwayरेल्वे