शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वे मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 21:06 IST

Indian Railway News: सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा धडाका लावलेला आहे. एअर इंडियासारखी सरकारी विमान कंपनीही खासगी हातात देण्यात आली आहे. त्यामुळे आता मोदी सरकार रेल्वेचही खासगीकरण करणार की काय, असा प्रश्न विचारण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी मोठे विधान केले आहे. सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे वैष्णव यांनी म्हटले आहे.

लोकसभेमध्ये २०२२-२३साठी रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानांच्या मागणीवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेने हल्लीच भरतीबाबतच्या गैरसमजावर सहानुभूतीपूर्वक मार्गाने तोडगा काढला आहे. रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, रेल्वेच्या भरतींवर कुठलेही निर्बंध नसून, १.१४ लाख रिक्त पदांसाटी भरती सुरू आहे.

त्यानंतर लोकसभेने आवाजी मतदानाने रेल्वेसाठी अनुदानाच्या मागणील मान्यता दिली. चर्चेदरम्यान, अनेक खासदारांनी सरकारवर रेल्वेच्या खासगीकरणाचा आरोप केला. त्यावर रेल्वेमंत्री म्हणाले की, ही चर्चा काल्पनिक आहे. ट्रॅक रेल्वेचे आहेत. स्टेशन रेल्वेचे आहेत. इंजिन रेल्वेची आहेत. गाड्या रेल्वेच्या आहेत. सिग्नलिंग सिस्टिम रेल्वेची आहे. तिथे खासगीकरणासारखी कुठलीही बाब नाही आहे. रेल्वेच्या खासगीकरणाची कुठलीही योजना नाही आहे.

दरम्यान, फ्रेट कॉरिडॉरच्या खासगीकरणाचीही कुठलीही योजना नसल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सभागृहा सांगितले. त्यांनी सांगितले की, रेल्वे सामाजिक दायित्वांना पूर्ण करणे सुरू ठेवेल. तसेच प्रवासी भाड्यावर ६० हजार रुपयांची सब्सिडी दिली जाते.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकारrailwayरेल्वे