शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

Indian Railway: भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले, म्हणाले याची कुठलीही शक्यता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:25 IST

Indian Railway Privatization: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारभारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. ही शंका जुनी झाली आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्याची कुठलीही शक्यता नाही आहे, असे सांगतं अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे.

न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या खासगीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही शंका आता जुनी झाली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं सांगितलं होतं. रेल्वे एवढी कॉम्प्लेक्स आहे. सोशल ऑब्लिगेशन आहे, सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. त्यामुळे तिच्या खासगीकरणाचा कुठलाही इरादा नाही आहे. स्पष्टपणे सांगायचं तर रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकपणा आणला आहे. २११ शहरांमधील ७२६ सेंटरमध्ये १५ भाषांमध्ये १.२५ कोटी परीक्षार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षेचं आयोजन करणं सोपं नाही. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा नेतृत्व देशाला कुठल्या दिशेने घेऊन जाऊ इच्छित आहे हे स्पष्ट असतं. एवढ्या  मोठ्या प्रमाणात रोजगार देण ही मोठी गोष्ट आहे.

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, रेल्वे एक टेक्निकल डिपार्टमेंट आहे. टेक्निकल डिसिजन खूप मौल्यवान असतं. मात्र सर्वांची आपलं काम करण्याची एक पद्धत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ तास काम करतात. पहाटे ४ वाजता जपानहून पोहोचून कॅबिनेट मिटिंगमध्ये उपस्थित राहतात. ते मेहनत आणि पराकाष्ठेचं ज्वलंत उदाहरण समोर ठेवतात. आपल्या देशातील वर्क कल्चरमध्ये परिवर्तन आलं आहे. पारदर्शकता वाढली आहे. नेतृत्व स्पष्ट असलं तर सर्व टीमना काम करणं सोपं पडतं. तसेच ती स्पष्टता पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत.

भारत गौरव ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्यापक विचार आहे. तुम्ही जेव्हा कुठल्याही देशात जाता तेव्हा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचा हेतू प्रभावी पद्धतीने आपली संस्कृती दाखवण्याचा असतो. भारतामध्ये लाखो गोष्टी आहेत. रेल्वेने त्यांचंच माध्यम बनवलं पाहिज, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकार