शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले, म्हणाले याची कुठलीही शक्यता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:25 IST

Indian Railway Privatization: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारभारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. ही शंका जुनी झाली आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्याची कुठलीही शक्यता नाही आहे, असे सांगतं अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे.

न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या खासगीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही शंका आता जुनी झाली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं सांगितलं होतं. रेल्वे एवढी कॉम्प्लेक्स आहे. सोशल ऑब्लिगेशन आहे, सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. त्यामुळे तिच्या खासगीकरणाचा कुठलाही इरादा नाही आहे. स्पष्टपणे सांगायचं तर रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकपणा आणला आहे. २११ शहरांमधील ७२६ सेंटरमध्ये १५ भाषांमध्ये १.२५ कोटी परीक्षार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षेचं आयोजन करणं सोपं नाही. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा नेतृत्व देशाला कुठल्या दिशेने घेऊन जाऊ इच्छित आहे हे स्पष्ट असतं. एवढ्या  मोठ्या प्रमाणात रोजगार देण ही मोठी गोष्ट आहे.

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, रेल्वे एक टेक्निकल डिपार्टमेंट आहे. टेक्निकल डिसिजन खूप मौल्यवान असतं. मात्र सर्वांची आपलं काम करण्याची एक पद्धत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ तास काम करतात. पहाटे ४ वाजता जपानहून पोहोचून कॅबिनेट मिटिंगमध्ये उपस्थित राहतात. ते मेहनत आणि पराकाष्ठेचं ज्वलंत उदाहरण समोर ठेवतात. आपल्या देशातील वर्क कल्चरमध्ये परिवर्तन आलं आहे. पारदर्शकता वाढली आहे. नेतृत्व स्पष्ट असलं तर सर्व टीमना काम करणं सोपं पडतं. तसेच ती स्पष्टता पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत.

भारत गौरव ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं की, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्यापक विचार आहे. तुम्ही जेव्हा कुठल्याही देशात जाता तेव्हा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचा हेतू प्रभावी पद्धतीने आपली संस्कृती दाखवण्याचा असतो. भारतामध्ये लाखो गोष्टी आहेत. रेल्वेने त्यांचंच माध्यम बनवलं पाहिज, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकार